शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

शहरातील विनापरवानगी आरओ प्लांट, बोअर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लांटच्या चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत. याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे कॉन्सेट टू ऑपरेट सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटी आणि फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांच्या ना-हरकत, परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या पिण्याच्या थंड पाण्याचे जार-कॅन विक्री करण्याचा व्यवसाय, प्लांट तात्काळ बंद, सील करण्याबाबत निर्देश मिळाले आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांचे आदेश, मानवी आरोग्यास पाणी अपायकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शुद्ध व थंड पाण्याच्या नावावर अनेकांनी शहरात विनापरवानगी आरओ प्लॉंट सुरू केले आहेत.  हे पाणी मानवी आरोग्यास अपायकारक अन् भूगर्भातील अमर्याद उपसा करून मिळविलेले असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व पिण्याचे थंड पाणी कॅन-जार प्लांट बंद करून सील करण्याचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी  प्रशासनाला दिले. राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लांटच्या चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत. याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे कॉन्सेट टू ऑपरेट सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटी आणि फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांच्या ना-हरकत, परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या पिण्याच्या थंड पाण्याचे जार-कॅन विक्री करण्याचा व्यवसाय, प्लांट तात्काळ बंद, सील करण्याबाबत निर्देश मिळाले आहेत. हरित लवादात दाखल प्रकरण क्र. ७५/२०१७ नुसार जलप्रदूषण अधिनियम १९७४ व वायुप्रदूषण अधिनियम १९८१ अन्वये पिण्याचे थंड पाणी कॅन-जारमध्ये विक्रीकरिता निर्माण करणाऱ्या उद्योगांसंदर्भात उपरोक्त याचिका दाखल असून, विनापरवानगी सुरू असलेले युनिट-प्लांट तात्काळ सील करण्याचे व कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे आहेत. महानगरपालिकेने त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. 

तीन दिवसांत मागितला अहवालआदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व झोन अंतर्गत ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक आणि बाजार व परवाना विभागाकडून पथक स्थापन करण्यात आले.  तीन दिवसांच्या आत थंड पाणी विक्री व उत्पादन होणारे प्लांट बंद करून सील करण्याचे आदेश व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी यंत्रणेला दिले आहेत. 

भूगर्भाचा अमर्याद उपसा  महापालिका क्षेत्रातील आरओ प्लांटमुळे भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्याने शहरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्लांटचा शोध घेऊन त्यांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ व बाजार परवाना विभागाची नोंदणी करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले. मात्र, प्रशासनाला याचा विसर पडला. 

हॉटेलमध्येही वापरले जाते बोअरचे पाणी अनेक हॉटेलमध्ये नियमबाह्य बोअर करून पाण्याचा वाणिज्यीक वापर होत आहे. आरओ प्लांटमध्येही नियमबाह्य बोअर तयार करून विनापरवानगी उपसा होत आहे. या व्यावसायिकांकडे तीन प्रकारच्या एनओसी नसल्याने अशा ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. सध्या ३० ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे बाजार परवाना विभागाचे प्रमुख श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी