शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वापायी उमेश सोसतोय असह्य वेदना!

By admin | Updated: September 9, 2016 00:37 IST

मुुलाला जत्मत: आलेले अपंगत्व अन् कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य, मुलाचं संगोपन करताना कुटुंबाची होत असलेली वाताहात,

समाज स्वीकारणार का दायित्व ? : १५ वर्षांपासून मदतीसाठी आईचा आर्त टाहोमनोज मानतकर  नांदगाव खंडेश्वरमुुलाला जत्मत: आलेले अपंगत्व अन् कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य, मुलाचं संगोपन करताना कुटुंबाची होत असलेली वाताहात, अपंगत्वापायी मुलाला होत असलेल्या असह्य वेदना, मुलाच्या अपंगत्वापायी आईची झालेली केविलवाणी स्थिती बघितली की, पाहणाऱ्यांचे डोळे पाणावल्याशिवाय रहावत नाही. असाच प्रत्यय तालुक्यातील येनस येथील उमेश रघुते नामक युवकाला जन्मताच आलेले अपंगत्व व उमेशच्या उपचारासाठी तसेच संगोपनासाठी कुटुंबाची होत असलेली दाणादान, पैशाअभावी उपचारासाठी आईची शासन दरबारी होत असलेली मदतीची याचना यामधून रघुते कुटुंबीयांसमोर निर्माण झालेला दारिद्र्याचा बहुपाश दिसून येतो.तालुक्यातील येनस या गावात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या नीता रघुते या महिलेच्या उमेश नामक मुलाला जन्मत:च अपंगत्व आले. त्यामुळे त्याला चालताही येत नाही उचलून नेण्यासाठी त्याला दोन जणांचा आधार घ्यावा लागतो. दिवसभर मोलमजुरी करून मुलाचे संगोपन करणे नीता रघुते यांना कठीण होऊन जाते. तुटपुंज्या पैशात मुलाचे संगोपन करावे की पोटाची आग विझवावी हा प्रश्न रघूते कुटुंबियांसमोर निर्माण झाला आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईची असल्याने उमेशचे वडील नागपूर येथे सायकल दुरुस्ती करतात. त्यामुळे कसाबसा कुटुंबाचा गाडा हाकला जातो. आता उमेश पंधरा वर्षांचा झाला असून त्याच्या देखभाल करण्यातच नीता रघुते यांचा पूर्ण दिवस निघून जातो. त्यामुळे आता उमेशचे संगोपन करताना रघुते कुटुंबीयांना फार अडचण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत शासन काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा ठेवून नीता रघुते तहसील कार्यालयात गेल्या असता त्यांची शासन दरबारीसुद्धा उपेक्षाच झाली आहे. उमेश अठरा वर्षांचा होईपर्यंत आम्ही त्याला कुठलीही मदत देऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी रघुते कुटुंबीयांसमोर उमेशच्या संगोपनाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेशला ८० टक्के अपंगत्व आले असून परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे रघुते कुटुंबीयांना अशक्य होत आहे. उमेश प्रमाणे असे अनेक दिव्यांग असतील ज्यांच्यावर परिस्थिती अभावी वैद्यकीय उपचार घेणे अशक्य होऊन जाते अशा परिस्थितीत शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत कुठलीही वयोमर्यादा न ठेवता तत्काळ मदतीचा हात देणे गरजेचे आहे, जेणेकरून अपंगत्वावर मात करणे शक्य होईल.