शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अपंगत्वापायी उमेश सोसतोय असह्य वेदना!

By admin | Updated: September 9, 2016 00:37 IST

मुुलाला जत्मत: आलेले अपंगत्व अन् कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य, मुलाचं संगोपन करताना कुटुंबाची होत असलेली वाताहात,

समाज स्वीकारणार का दायित्व ? : १५ वर्षांपासून मदतीसाठी आईचा आर्त टाहोमनोज मानतकर  नांदगाव खंडेश्वरमुुलाला जत्मत: आलेले अपंगत्व अन् कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य, मुलाचं संगोपन करताना कुटुंबाची होत असलेली वाताहात, अपंगत्वापायी मुलाला होत असलेल्या असह्य वेदना, मुलाच्या अपंगत्वापायी आईची झालेली केविलवाणी स्थिती बघितली की, पाहणाऱ्यांचे डोळे पाणावल्याशिवाय रहावत नाही. असाच प्रत्यय तालुक्यातील येनस येथील उमेश रघुते नामक युवकाला जन्मताच आलेले अपंगत्व व उमेशच्या उपचारासाठी तसेच संगोपनासाठी कुटुंबाची होत असलेली दाणादान, पैशाअभावी उपचारासाठी आईची शासन दरबारी होत असलेली मदतीची याचना यामधून रघुते कुटुंबीयांसमोर निर्माण झालेला दारिद्र्याचा बहुपाश दिसून येतो.तालुक्यातील येनस या गावात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या नीता रघुते या महिलेच्या उमेश नामक मुलाला जन्मत:च अपंगत्व आले. त्यामुळे त्याला चालताही येत नाही उचलून नेण्यासाठी त्याला दोन जणांचा आधार घ्यावा लागतो. दिवसभर मोलमजुरी करून मुलाचे संगोपन करणे नीता रघुते यांना कठीण होऊन जाते. तुटपुंज्या पैशात मुलाचे संगोपन करावे की पोटाची आग विझवावी हा प्रश्न रघूते कुटुंबियांसमोर निर्माण झाला आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईची असल्याने उमेशचे वडील नागपूर येथे सायकल दुरुस्ती करतात. त्यामुळे कसाबसा कुटुंबाचा गाडा हाकला जातो. आता उमेश पंधरा वर्षांचा झाला असून त्याच्या देखभाल करण्यातच नीता रघुते यांचा पूर्ण दिवस निघून जातो. त्यामुळे आता उमेशचे संगोपन करताना रघुते कुटुंबीयांना फार अडचण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत शासन काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा ठेवून नीता रघुते तहसील कार्यालयात गेल्या असता त्यांची शासन दरबारीसुद्धा उपेक्षाच झाली आहे. उमेश अठरा वर्षांचा होईपर्यंत आम्ही त्याला कुठलीही मदत देऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी रघुते कुटुंबीयांसमोर उमेशच्या संगोपनाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेशला ८० टक्के अपंगत्व आले असून परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे रघुते कुटुंबीयांना अशक्य होत आहे. उमेश प्रमाणे असे अनेक दिव्यांग असतील ज्यांच्यावर परिस्थिती अभावी वैद्यकीय उपचार घेणे अशक्य होऊन जाते अशा परिस्थितीत शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत कुठलीही वयोमर्यादा न ठेवता तत्काळ मदतीचा हात देणे गरजेचे आहे, जेणेकरून अपंगत्वावर मात करणे शक्य होईल.