शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : सहायक पोलीस निरीक्षकांसह सहा अंमलदार तडकाफडकी ‘अटॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 16:07 IST

पोलीस आयुक्तालयाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. या दंडुक्यामुळे अवघ्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसीपींचा दंडुका : कारवाईचा बडगा

अमरावती : नागपुरी गेट ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, तेथीलच बिट सांभाळणारे चार पोलीस अंमलदार, शहर कोतवालीतील डीबी प्रमुखासह विशेष शाखेतील एकासह सात अधिकारी कर्मचाऱ्यांना सोमवारी सायंकाळी तडकाफडकी मुख्यालयी संलग्न करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. या दंडुक्यामुळे अवघ्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर पहिले दोन आरोपी पकडण्यात शहर कोतवालीला आलेले अपयश, गुन्ह्याचे कारण स्पष्ट करण्यास घेतलेला १२ दिवसांचा कालावधी, तेथील डीबी प्रमुखाने त्याकडे केलेले कथित दुर्लक्ष, खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केलेले आरोप व नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्ट, त्याअनुषंगाने काहींना आलेल्या धमक्या, नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी व संशयितांकडे मिळालेले आक्षेपार्ह साहित्य, या सर्व बाबींच्या अनुषंगाने ‘मुख्यालयी अटॅच’ ची कारवाई करण्यात आली. एसीपीद्वारे संबंधित ठाणेदार व पोलीस निरीक्षकांसह त्या सातही जणांना त्वरेने सोडण्याचे आदेश सोमवारी सायंकाळनंतर जारी करण्यात आले. तत्पूर्वी, नागपुरी गेट व शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका खुफियासह विशेष शाखेतील दोघांना मुख्यालयी संलग्न करण्यात आले होते. आता, विशेष शाखेतील एक धार्मिक हेड सांभाळणाऱ्या पोलीस अंमलदारालादेखील मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले.

शहर कोतवालीत खांदेपालट?

२१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. शहर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर २३ जून रोजी शहर कोतवालीऐवजी गुन्हे शाखेने मुदस्सीर अहमद व शाहरुख पठाण यांना अटक केली. तर, दोन आरोपीदेखील निष्पन्न केले. यात सायबर पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. यात कोतवाली व डीबीचे अपयश प्रामुख्याने उजेडात आले. त्याअनुषंगाने तेथील डीबीप्रमुख व खुफियाला तडकाफडकी हटविण्यात आले. त्यामुळे आगामी काळात तेथे नेतृत्वबदल होईल, अशी शक्यता पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मोटो नव्हे, तर आरोपी अटकेला प्राधान्य

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानुसार, स्थानिक स्तरावर घडणाऱ्या खुनाच्या घटनांचे कारण जुने वैमनस्य, प्रेमप्रकरण, संपत्तीचा वाद, वर्चस्व गाजविणे, भाईगिरी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या खुनाचा तपास करताना स्थानिक पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास प्राधान्य दिले. पाचही आरोपींनी खुनाची कबुली दिली. मात्र, सहाव्याकडे बोट दाखविले. त्यामुळे सहावा आरोपी हाती आल्यानंतर हत्येचा ‘मोटो’ उघड झाला. स्थानिक पोलीस यंत्रणा आरोपींना अटक करण्यासच प्रथम प्राधान्य देत असल्याची पुष्टी त्या अधिकाऱ्याने ‘शोकॉज’च्या पार्श्वभूमीवर जोडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती