शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : सहायक पोलीस निरीक्षकांसह सहा अंमलदार तडकाफडकी ‘अटॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 16:07 IST

पोलीस आयुक्तालयाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. या दंडुक्यामुळे अवघ्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसीपींचा दंडुका : कारवाईचा बडगा

अमरावती : नागपुरी गेट ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, तेथीलच बिट सांभाळणारे चार पोलीस अंमलदार, शहर कोतवालीतील डीबी प्रमुखासह विशेष शाखेतील एकासह सात अधिकारी कर्मचाऱ्यांना सोमवारी सायंकाळी तडकाफडकी मुख्यालयी संलग्न करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. या दंडुक्यामुळे अवघ्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर पहिले दोन आरोपी पकडण्यात शहर कोतवालीला आलेले अपयश, गुन्ह्याचे कारण स्पष्ट करण्यास घेतलेला १२ दिवसांचा कालावधी, तेथील डीबी प्रमुखाने त्याकडे केलेले कथित दुर्लक्ष, खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केलेले आरोप व नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्ट, त्याअनुषंगाने काहींना आलेल्या धमक्या, नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी व संशयितांकडे मिळालेले आक्षेपार्ह साहित्य, या सर्व बाबींच्या अनुषंगाने ‘मुख्यालयी अटॅच’ ची कारवाई करण्यात आली. एसीपीद्वारे संबंधित ठाणेदार व पोलीस निरीक्षकांसह त्या सातही जणांना त्वरेने सोडण्याचे आदेश सोमवारी सायंकाळनंतर जारी करण्यात आले. तत्पूर्वी, नागपुरी गेट व शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका खुफियासह विशेष शाखेतील दोघांना मुख्यालयी संलग्न करण्यात आले होते. आता, विशेष शाखेतील एक धार्मिक हेड सांभाळणाऱ्या पोलीस अंमलदारालादेखील मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले.

शहर कोतवालीत खांदेपालट?

२१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. शहर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर २३ जून रोजी शहर कोतवालीऐवजी गुन्हे शाखेने मुदस्सीर अहमद व शाहरुख पठाण यांना अटक केली. तर, दोन आरोपीदेखील निष्पन्न केले. यात सायबर पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. यात कोतवाली व डीबीचे अपयश प्रामुख्याने उजेडात आले. त्याअनुषंगाने तेथील डीबीप्रमुख व खुफियाला तडकाफडकी हटविण्यात आले. त्यामुळे आगामी काळात तेथे नेतृत्वबदल होईल, अशी शक्यता पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मोटो नव्हे, तर आरोपी अटकेला प्राधान्य

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानुसार, स्थानिक स्तरावर घडणाऱ्या खुनाच्या घटनांचे कारण जुने वैमनस्य, प्रेमप्रकरण, संपत्तीचा वाद, वर्चस्व गाजविणे, भाईगिरी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या खुनाचा तपास करताना स्थानिक पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास प्राधान्य दिले. पाचही आरोपींनी खुनाची कबुली दिली. मात्र, सहाव्याकडे बोट दाखविले. त्यामुळे सहावा आरोपी हाती आल्यानंतर हत्येचा ‘मोटो’ उघड झाला. स्थानिक पोलीस यंत्रणा आरोपींना अटक करण्यासच प्रथम प्राधान्य देत असल्याची पुष्टी त्या अधिकाऱ्याने ‘शोकॉज’च्या पार्श्वभूमीवर जोडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती