शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

आरओबीच्या मुद्यावर प्रशासनाला ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:17 IST

आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा, असा अल्टिमेटमच खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देनवनीत राणा : पादचारी, दुचाकीस्वारांसाठी अंडरपास त्वरित सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा, असा अल्टिमेटमच खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला.३१ जुलैपर्यंत काम पूर्ण होईल. दस्तुरनगरकडील मार्ग जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. रेल्वेचे काम आटोपल्यानंतर बांधकाम विभागाचे काम करता येणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी वाय.डी. राव यांनी सांगितले. यावर खासदरांनी बैठकीपश्चात पाहणी करून किमान नागरिक व दुचाकीसाठी अंडरपास सुरू करता येईल काय, याची पाहणी करून तोडगा काढण्यास सुचविले. बैठकीला आमदार रवि राणा, आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहआयुक्त नरेंद्र पिठे, विभागीय अधिकारी नीलेश बेलसरे, सहायक वाहतूक अधीक्षक वैशाली भाकरे, रेल्वेचे डिझाइन इंजिनीअर एन.पी. पाटील, उपअभियंता एस.एन, जसवंते, नायब तहसीलदार विजय मांजरे, वाहतुक शाखेचे राहूल आठवले, सिटी बसचे विपीन चव्हाण यांच्यासह युवा स्वाभिमाने नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. वेळेचे बंधन पाळा, विहीत मुदतीच्या आत पुर्ण करण्याच्या सूचना खासदार राणा यांनी दिल्या.शहरातील मध्य भागात काम करीत आहात, याचे भान ठेवा. तीन वर्षांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे विभागाद्वारे दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यामुळे किमान नागरिकांना पायी चालण्यासाठी तसेच दुचाकीसाठी आजच रस्ता मोकळा करा, अशी सूचना आमदार रवि राणा यांनी दिली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सायंकाळपर्यंत याची माहिती देतो, असे वाय.डी. राव म्हणाले. मुदतीच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी दिले. यावेळी शहर विकासासंदर्भात अनेक मुद्द्यांवर चर्चा पार पडली.शहर बस वाहतूक शाखेची पोलखोलशहराच्या २० किमी हद्दीत शहर बस सेवा सुरू करण्याला प्रधान सचिवांनी मंजुरी दिली. मात्र, महापालिकेत त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी सहा महिन्यांपासून झालेली नाही, याबाबत आ. रवि राणा यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ४० बस मंजूर; रस्त्यावर २५ आहेत. विद्यार्थ्यांना सुविधा नाहीत, याबाबत आ. राणा यांनी खडे बोल सुनावले.अकोली वळणरस्त्याला गती केव्हा?अकोली, चमननगर रस्त्याकरिता भूसंपादनासाठी १२ कोटींचा निधी खेचून आणला; मात्र प्रशासनाच्या दिरंगाईने प्रक्रियाच मंदावली. जागा उपलब्ध असल्याने ‘त्या’ २७ लोकांची बैठक लावण्याची सूचना गणेश कुत्तरमारे यांना आ. राणा यांनी केली. प्रस्तावाची फाईल या आठवड्यात जिल्ह्याधिकाºयांसमक्ष ठेवा, असे आ. राणा म्हणाले.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा