शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

महिनाभरात दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असून, यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्यामुळे कोणी कालव्यात पडला की, त्याचा मृत्यूच अटळ आहे. महिनाभरात या कालव्यात दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देउपाययोजना केव्हा? : अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का नाही?

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : शेतकऱ्यांना वरदान ठरणारा अप्पर वर्धा$ प्रकल्पाचा तिवसा-सातरगाव मार्गावरील कालवा हा नागरिकांसाठी मात्र जीवघेणा ठरत आहे. या कालव्यात अनेकांचे जीव गेले असले तरीही तातडीच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या जीवघेण्या दुर्लक्षितपणासाठी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का नोंदविण्यात येऊ नयेत, असा सवाल उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असून, यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्यामुळे कोणी कालव्यात पडला की, त्याचा मृत्यूच अटळ आहे. महिनाभरात या कालव्यात दोघांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही या कालव्यात नागरिक कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी येतात. त्यांना धोक्याच्या सूचना देणाऱ्या उपाययोजनांची येथे वानवा आहे.जाळ्या लावण्याची मागणीतिवसा ते सातरगाव रोडवर आनंदवाडी येथे लोकवस्तीनजीक हा कालवा वाहतो. येथेच अनेक जण कालव्यात वाहून गेले आहेत. सुरक्षेसाठी लोकवस्तीनजीक कालव्याला जाळ्या लावणे गरजेचे झाले आहे. कालव्यात लोखंडी कड्या तसेच चाळणी लावण्यात याव्या, अशीही मागणी होत आहे. मात्र, अप्पर वर्धा प्रकल्प प्रशासनाने यातील एकही मागणी पूर्ण केलेली नाही.कठड्याची उंची वाढवाकाही तरुण सातरगाव मार्गातील पुलाच्या कठड्यावरून कालव्यात उडी घेतात. त्यामुळे या कालव्याच्या पुलाच्या कठड्याची उंचीदेखील वाढविण्याची गरज आहे.फलक धूसरकालव्याच्या कडेला लावलेले धोक्याची सूचना देणारे फलक पूर्णपणे धूसर झाले आहेत. निदान ते व्यवस्थित केले तरी नागरिकांना इशारा मिळू शकतो. मात्र, तेही झालेले नाही.कालवा हा रेड झोनमध्ये आहे. या कालव्यात कोणी आंघोळ अथवा कपडे धुण्यासाठी जाऊ नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अप्पर वर्धा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.- वैभव फरतारे,तहसीलदार, तिवसापाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने कालवा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहे. या क्षेत्रात धोक्याची सूचना देणारे फलक लावले आहेत. पोलिसांनाही याबाबत कळविले आहे. आमच्याकडे कालवा निरीक्षक आदी पदांचा वानवा आहे, शिवाय एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी कठडे लावणे शक्य नाही.- पी.डी. सोळंके, कार्यकारी अभियंता, अप्पर वर्धा प्रकल्प

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती