शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

महिनाभरात दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असून, यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्यामुळे कोणी कालव्यात पडला की, त्याचा मृत्यूच अटळ आहे. महिनाभरात या कालव्यात दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देउपाययोजना केव्हा? : अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का नाही?

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : शेतकऱ्यांना वरदान ठरणारा अप्पर वर्धा$ प्रकल्पाचा तिवसा-सातरगाव मार्गावरील कालवा हा नागरिकांसाठी मात्र जीवघेणा ठरत आहे. या कालव्यात अनेकांचे जीव गेले असले तरीही तातडीच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या जीवघेण्या दुर्लक्षितपणासाठी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का नोंदविण्यात येऊ नयेत, असा सवाल उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असून, यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्यामुळे कोणी कालव्यात पडला की, त्याचा मृत्यूच अटळ आहे. महिनाभरात या कालव्यात दोघांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही या कालव्यात नागरिक कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी येतात. त्यांना धोक्याच्या सूचना देणाऱ्या उपाययोजनांची येथे वानवा आहे.जाळ्या लावण्याची मागणीतिवसा ते सातरगाव रोडवर आनंदवाडी येथे लोकवस्तीनजीक हा कालवा वाहतो. येथेच अनेक जण कालव्यात वाहून गेले आहेत. सुरक्षेसाठी लोकवस्तीनजीक कालव्याला जाळ्या लावणे गरजेचे झाले आहे. कालव्यात लोखंडी कड्या तसेच चाळणी लावण्यात याव्या, अशीही मागणी होत आहे. मात्र, अप्पर वर्धा प्रकल्प प्रशासनाने यातील एकही मागणी पूर्ण केलेली नाही.कठड्याची उंची वाढवाकाही तरुण सातरगाव मार्गातील पुलाच्या कठड्यावरून कालव्यात उडी घेतात. त्यामुळे या कालव्याच्या पुलाच्या कठड्याची उंचीदेखील वाढविण्याची गरज आहे.फलक धूसरकालव्याच्या कडेला लावलेले धोक्याची सूचना देणारे फलक पूर्णपणे धूसर झाले आहेत. निदान ते व्यवस्थित केले तरी नागरिकांना इशारा मिळू शकतो. मात्र, तेही झालेले नाही.कालवा हा रेड झोनमध्ये आहे. या कालव्यात कोणी आंघोळ अथवा कपडे धुण्यासाठी जाऊ नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अप्पर वर्धा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.- वैभव फरतारे,तहसीलदार, तिवसापाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने कालवा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहे. या क्षेत्रात धोक्याची सूचना देणारे फलक लावले आहेत. पोलिसांनाही याबाबत कळविले आहे. आमच्याकडे कालवा निरीक्षक आदी पदांचा वानवा आहे, शिवाय एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी कठडे लावणे शक्य नाही.- पी.डी. सोळंके, कार्यकारी अभियंता, अप्पर वर्धा प्रकल्प

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती