शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अचलपूरमध्ये दोन हजार ऑटोरिक्षा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये असलेल्या दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांमध्ये एकट्या अचलपूर शहरातील १ हजार ३०० ऑटोरिक्षा आहेत. परतवाडा शहरात ७०० ते ८०० ऑटोरिक्षा आहेत. यातील हे ऑटोरिक्षा अचलपूरमधील देवडी, चावल मंडी, गांधी पुलावरून, तर परतवाड्यातील ऑटोरिक्षा बस स्टँड, गुजरी, दुरानी चौक, चिखलदरा बस स्टॉप, टिळक चौक, लाकूडबाजार, जयस्तंभ, कॉटन मार्केट, विदर्भ मिल, अचलपूर नाका परिसरातून ये-जा करीत असतात.

ठळक मुद्देरोजीरोटी बुडाली : आर्थिक चणचण, चालक त्रस्त; प्रवासी मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूरमध्ये दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांची चाके लॉकडाऊनमध्ये थांबली आहेत. यात ऑटोरिक्षाचालकांची रोजीरोटी बुडाली असून, त्यांचे कुटुंब आर्थिक चणचणीत भरडले जात आहे. उपासमारीची शक्यता निर्माण झाली आहे.अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीसह लगतच्या मल्हारा, गौरखेडा, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी, देवगाव, हरम, भिलोना, नारायणपूर, जवर्डी, तोंडगाव, बेलखेडा, म्हसोना परिसरातील कुटुंबांना दोन हजारांवर ऑटोरिक्षा लाइफ लाइन ठरले आहेत. पण, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद आहेत. एसटी महामंडळाच्या सार्वजनिक वाहतुकीसह अन्य खासगी वाहतूक बंद आहे. शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने घरीच थांबण्याची सक्ती प्रवासी व पर्यायाने ऑटोरिक्षाचालकांवर आली आहे. ऑटोरिक्षा रस्त्यावर आलाच, तर प्रवासी उपलब्ध नाहीत. त्यामुळे कमिशनवर प्रवासी बसवणाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे. आर्थिक संकटांचा सामना त्यांना करावा लागत आहे. दोन वेळच्या जेवणाची चिंता त्यांना लागली आहे.लॉकडाऊनमध्ये असलेल्या दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांमध्ये एकट्या अचलपूर शहरातील १ हजार ३०० ऑटोरिक्षा आहेत. परतवाडा शहरात ७०० ते ८०० ऑटोरिक्षा आहेत. यातील हे ऑटोरिक्षा अचलपूरमधील देवडी, चावल मंडी, गांधी पुलावरून, तर परतवाड्यातील ऑटोरिक्षा बस स्टँड, गुजरी, दुरानी चौक, चिखलदरा बस स्टॉप, टिळक चौक, लाकूडबाजार, जयस्तंभ, कॉटन मार्केट, विदर्भ मिल, अचलपूर नाका परिसरातून ये-जा करीत असतात. पण, लॉकडाऊन मोठ्या मुश्किलीने एखादा ऑटोरिक्षा दिवसातून चौकात, रस्त्याने दिसतो, तोही प्रवाशांविना.लॉकडाऊन हटल्यानंतरही जोपर्यंत सर्वच यंत्रणा सुरळीत होत नाही, लोकांची ये-जा वाढत नाही तोपर्यंत या ऑटोरिक्षाचालकांच्या रोजीरोटीचे खरे नाही. त्यांच्या रोजीरोटीबाबत अनिश्चितता आहे. अशात या अ‍ॅटोचालकांच्या दोन हजार कुटुंबांतील दहा हजार लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासन-प्रशासनाकडून या लोकांनाही मदतीची अपेक्षा आहे.पुसल्यातील चालकांवर उपासमारीची वेळपुसला : देशात लॉकडाऊन लागल्यापासून हाताला काम नसल्यामुळे पुसला येथील ऑटोरिक्षाचालकांवर उपासमाराची वेळ ओढवली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाचालक-मालकांना शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आ. देवेंद्र भुयार व प्रशासनाकडे देण्यात आले. यावेळी प्रकाश गजभिये, शफीक बबलू शेख, सुनिल पाटील, महम्मद शकील आदी उपस्थित होते.मृत्यू दुर्दैवीऑटोरिक्षामध्ये कमिशनवर प्रवासी बसवणाºया राजेश माहोरे यांची रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेने प्रकृती खालावली अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चिखलदरा स्टॉपवर ते १० रुपये प्रतिवाहन दराने प्रवासी उपलब्ध करायचे. दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये त्यांना मिळायचे. पण, लॉकडाऊनमध्ये वाहनांची चाके थांबली.अचलपूरमध्ये दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षा आहेत. यात अचलपूर शहरातून १ हजार ३००, तर परतवाड्यातून ७०० ते ८०० ऑटोरिक्षा जवळच्या खेडेगावापर्यंत प्रवाशांची ने-आण करतात. लॉकडाऊनमुळे ही लाइफ लाइन ठप्प पडली आहे. चालकांसह प्रवासी मिळवून देणाºयांचाही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे.- अब्दुल मलीक, अध्यक्ष, विदर्भ प्रदेश, राष्ट्रीय ऑटोरिक्षा युनियन.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या