शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

आणखी दोन दिवस शीतलहर नव्या वर्षाचे स्वागत पावसाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

सध्या उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असल्याने तसेच मध्य प्रदेशवर १.५ किमी उंचीवर वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ती थंड हवा महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. त्यामुळे विदर्भात सध्या थंडीची लाट आहे. एक पश्चिमी चक्रवात (विक्षोभ) हिमालय तसेच मध्यभारतासह उत्तर भारताला बाधित करण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञांची माहिती । ३० डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान ढगाळ अन् तुरळक पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या दक्षिणपूर्व अरबी समुद्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र तथा चक्राकार वारे थोडे पश्चिमेकडे सरकलेले आहेत. त्यामुळे सध्याचे पावसाळी वातावरण निवळले असले तरी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली.सध्या उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असल्याने तसेच मध्य प्रदेशवर १.५ किमी उंचीवर वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ती थंड हवा महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. त्यामुळे विदर्भात सध्या थंडीची लाट आहे. एक पश्चिमी चक्रवात (विक्षोभ) हिमालय तसेच मध्यभारतासह उत्तर भारताला बाधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये विदर्भात बरेच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गाारपीट देखील होऊ शकते असे बंड म्हणाले. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पूर्वेकडून वाहणारे बाष्पयुक्त वाºयाची मध्यभारतात टक्कर होण्याची शक्यता ३० डिसेंबरनंतर असल्यामुळे मध्य भारतात वादळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता अनिल बंड यांनी वर्तविली आहे.वायव्य भारतात वारे वायव्येकडून वाहत असल्याने व अन्य हावामान शास्त्रीय परिस्थिती अनुकूल असल्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश व अन्य ठिकाणी सध्या थंडीची लाट व दाट धुके आहेत. एक-दोन दिवसांत बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश व लगतच्या परिसरात हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. सध्या दिवसाचे तापमान घसरले आहे. शनिवारी सकाळी तापमान ११ अंशापर्यंत होते. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या, तर शहरात उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहे. अचानक वातावरण बदलामुळे सर्दी पडसा, खोकला व विषणुजन्य आजारांत वाढ झालेली आहे.कपाशी, तुरीचे नुकसानगत आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. चार दिवसांत बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कापूस ओला झाला तसेच जमिनीत आर्द्रता वाढत असल्याने हंगाम लांबणार व यामुळे पुन्हा बोंड अळीचे चक्र खंडित न झाल्यामुळे पुढील वर्षी पुन्हा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचा हंगाम वाढऊ नये, तसेच यासाठीचे एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :weatherहवामान