शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ई-केवायसी नसल्याचा दोन लाख शेतकऱ्यांना फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 12, 2023 17:22 IST

Amravati News शासनाने वर्षभरात पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ई-केवायसी करणे दोन लाख शेतकऱ्यांना महागात पडले आहे. योजनेच्या १३ व्या हप्ताची आकडेवारी आता जाहीर झाली. यामध्ये फक्त ९५,०३० शेतकरी खातेदारांनाच लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गजानन मोहोडअमरावती : शासनाने वर्षभरात पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ई-केवायसी करणे दोन लाख शेतकऱ्यांना महागात पडले आहे. योजनेच्या १३ व्या हप्ताची आकडेवारी आता जाहीर झाली. यामध्ये फक्त ९५,०३० शेतकरी खातेदारांनाच लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेसाठी ३.३९ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.

पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षभरात चार हप्त्यांमध्ये प्रत्येकी सहा हजारांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केल्या जात आहे. जानेवारी १०१९ पासून आतापर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. योजनेमध्ये १९,१४० अपात्र व ११,१७४ आयकरदात्या शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने या लाभार्थ्यांकडून रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरु आहे.याशिवाय योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याच्या सूचना शासन प्रशासनाद्वारा वारंवार दिल्या जात असतांना त्याकडे अनेक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ते शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. योजनेचा १३ हप्ता फक्त ९५ हजार शेतकऱ्यांनाच वितरीत झाल्याची आकडेवारी आता पुढे आलेली आहे. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी