शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

मेळघाटात अस्वलाच्या हल्ल्यात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:28 IST

११ जून रोजी सकाळी ७ वाजता दोन गावकरी रक्तबंबाळ अवस्थेत जंगलात पडून असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

ठळक मुद्देअकोट वन्यजीव विभागातील आलेवाडी परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अकोट वन्यजीव विभागाच्या दक्षिण आलेवाडी बीटमध्ये गुरुवारी सकाळी ७ वाजता दरम्यान अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण ठार झाले. त्यांचे सवंगडी पळून गेल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा अकोट व परिसरासह मेळघाटात खळबळ उडाली आहे. अशोक मोतीलाल गवते (५४) व माना बंडू गवते (४२, दोघेही रा. निमखेडी, ता.अकोट) अशी मृतांची नावे आहेत.११ जून रोजी सकाळी ७ वाजता दोन गावकरी रक्तबंबाळ अवस्थेत जंगलात पडून असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. ते सोनाळा परिक्षेत्रातील वारवट बकाल वर्तुळांतर्गत येणाऱ्या दक्षिण अलेवाडी बीट क्रमांक ३५७ मध्ये आढळून आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही गावकरी जंगलात विनापरवानगी शिरल्याची माहिती मिळाली. या गावकऱ्यांवर अस्वलाने हल्ला चढविताच इतर सहकारी पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्याघ्र अधिकाºयांंनी वर्तविला आहे. सदर घटनेची माहिती वनरक्षक ए. आर. थोटे यांनी अकोट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक टी. बेऊला यांना दिली. राज्याचे वनमंत्री संजय राठोड शुक्रवारपासून दोन दिवस मेळघाट दौऱ्यावर आहेत.जारिदात केले होते चौघांना ठारचिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या जारिदा येथे आठ वर्षांपूर्वी एका चवताळलेल्या अस्वलाने चौघांना ठार केले होते. त्यामध्ये वनकर्मचारी, शिक्षक, आश्रम शाळेतील विद्यार्थी व एका गावकऱ्याचा समावेश होता.सोनाळा परिक्षेत्रांतर्गत असलेल्या जंगलात अस्वलाने हल्ला करून दोन व्यक्ती ठार केले. यासंदर्भात चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.- टी. बेऊलाउपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव

टॅग्स :wildlifeवन्यजीव