शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

फोटो ०३एएमपीएच०१ लोकमत न्यूज नेटवर्क शिरखेड/तिवसा (अमरावती) : जिल्ह्यात दोन दिवसांत दोन युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विचोरी व वाठोडा ...

फोटो ०३एएमपीएच०१

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरखेड/तिवसा (अमरावती) : जिल्ह्यात दोन दिवसांत दोन युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विचोरी व वाठोडा खुर्द येथे या घटना घडल्या.

शिरखेड लगतच्या विचोरी येथे एका ३० वर्षीय शेतकरी युवकाने विष घेऊन आत्महत्या केली. मनोज रामचंद्र मुळे असे मृताचे नाव आहे. १ जुलै रोजी कृषिदिनी ही घटना घडली.

मनोज मुळे यांनी वडिलोपार्जित दोन एकर शेतीत सोयाबीनची पेरणी केली होती. दहा एकर शेत लागवडीसाठी घेऊन त्यातसुद्धा पेरणी केली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून पाऊस हुलकवणी देत असल्याने पेरलेल्या पिकाला मोड आली होती. पुढील पेरणी कशी करावी, या विवंचनेत मनोज मुळे यांनी राहत्या घरात विष प्राशन केले. याबाबतची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शुक्रवारी दुपारी मनोजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व वडील असा परिवार आहे.

तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील एका विवाहित अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली. गजानन वसंत कुबडे (३२, रा. वाठोडा) असे मृताचे आहे. २ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास घरी कुणीच नसताना विषारी औषध प्राशन केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कर्जापायी आत्महत्या केली असल्याचा सूर परिसरात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिमुकले मुले, आई-वडील आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.