शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र जगताप यांची दोन डझन पत्रे

By admin | Updated: June 22, 2016 00:10 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी वाळूमाफियांनी घातलेला हैदोस, त्यामुळे रस्त्यांची होणारी हानी, महसुलाची चोरी ...

नाकर्तेपणा : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली केराची टोपलीअमरावती : काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी वाळूमाफियांनी घातलेला हैदोस, त्यामुळे रस्त्यांची होणारी हानी, महसुलाची चोरी आणि मानवी जीविताचे अपघात या गंभीर मुद्यांवर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दोन डझनाहून अधिक पत्रे पाठविली आहेत. ३० डिसेंबर २०१३ पासून सुरू झालेला हा पत्रव्यवहार अगदी १ जून २०१६ पर्यंत अव्याहत सुरू आहे. जशी यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वीरेंद्र जगतापांच्या पत्रांना केराची टोपली दाखविली तशीच जगतापांच्या तळमळीची अवमानना विद्यमान जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीही सुरूच ठेवली.रेतीघाटाच्या लिलावाची मुदत ३१ मेपर्यंतच ठेवावी. ज्या ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसेल तेथून रेती वाहतूक करू नये, अशा आशयाचे पत्र आ.वीरेंद्र जगताप यांनी ३० डिसेंबर २०१३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते. विशेष असे की, बोरगाव निस्ताने येथील रेती वाहतुकीसंबंधीचे हे पत्र होते. रस्त्यांची दुर्दशा होत असल्यामुळे अतिभार वाहतुकीचे रेतीचे ट्रक रोखण्याचे पत्र ५ मे २०१४ रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते.लोकप्रतिनिधीही हतबलअमरावती : देवगाव, तळेगाव, सुलतानपुर, नांदगाव खंडेश्वर चौफुली, बडनेरा, अमरावतीमार्गे ३० ते ४० टन रेतीची वाहतूक सुरु झाल्याने रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली. मोठ्या महसुलाची चोरी सुरु आहे. रात्री ट्रक रस्त्यांवरच उभे केले जातात. त्यांना टेललाईट नसल्याने अपघातांची संख्या वाढली, असे अवगत करणारे पत्र आमदारांनी ४ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. या पत्रात रेतीचोरी करणाऱ्या पाच ट्रकचे क्रमांकही नमूद करण्यात आले आहेत. महसूल, गृह आणि परिवहन हे विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करतात. अतिभार वाहतूक त्यामुळे राजरोस सुरु आहे. २ ब्रासपेक्षा अधिक रेती देणाऱ्या घाटांवरच निलंबनाची कारवाई करावी, असे पत्र १ जून २०१५ रोजी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले. या पत्रात घाटांचा उल्लेख आहे.१०० कोटी रूपयांच्या रस्त्यांची हानी होत असल्याचे अभ्यासू पत्र जगताप यांनी २५ मे २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले. महसूल, गृह, परिवहन या विभागांनी एकत्रीतपणे अवैध रेतीवाहतुकीवर कारवाई करावी, असे सूचित केले. या पत्रात रस्ते कुण्या निधीतून आणि किती खर्च करून बांधले, याचा सविस्तर उल्लेख आहे. आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या काही ठळक पत्रांमधील मुद्दे आम्ही लोकदरबारात सादर केले. अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या वीरेंद्र जगतापांनी २० दिवसांपूर्वीपर्यंत पत्रांचा हा सिलसिला जारीच ठेवला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या नाकर्तेपणापुढे वीरेंद्र जगतापांनाही हात टेकवावे लागले.यवतमाळ कलेक्टरकरवी दखलवीरेंद्र जगतापांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही १ जून २०१५ रोजी पत्र लिहिले होते. त्यांनी या संबंधीची दखल घेऊन कळंब आणि बाभुळगाव येथील तहसीलदारांना २४ जून २०१५ रोजी २ ब्रासपेक्षा अधिक रेती वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश लेखी स्वरुपात दिले होते.