शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

वीरेंद्र जगताप यांची दोन डझन पत्रे

By admin | Updated: June 22, 2016 00:10 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी वाळूमाफियांनी घातलेला हैदोस, त्यामुळे रस्त्यांची होणारी हानी, महसुलाची चोरी ...

नाकर्तेपणा : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली केराची टोपलीअमरावती : काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी वाळूमाफियांनी घातलेला हैदोस, त्यामुळे रस्त्यांची होणारी हानी, महसुलाची चोरी आणि मानवी जीविताचे अपघात या गंभीर मुद्यांवर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दोन डझनाहून अधिक पत्रे पाठविली आहेत. ३० डिसेंबर २०१३ पासून सुरू झालेला हा पत्रव्यवहार अगदी १ जून २०१६ पर्यंत अव्याहत सुरू आहे. जशी यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वीरेंद्र जगतापांच्या पत्रांना केराची टोपली दाखविली तशीच जगतापांच्या तळमळीची अवमानना विद्यमान जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीही सुरूच ठेवली.रेतीघाटाच्या लिलावाची मुदत ३१ मेपर्यंतच ठेवावी. ज्या ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसेल तेथून रेती वाहतूक करू नये, अशा आशयाचे पत्र आ.वीरेंद्र जगताप यांनी ३० डिसेंबर २०१३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते. विशेष असे की, बोरगाव निस्ताने येथील रेती वाहतुकीसंबंधीचे हे पत्र होते. रस्त्यांची दुर्दशा होत असल्यामुळे अतिभार वाहतुकीचे रेतीचे ट्रक रोखण्याचे पत्र ५ मे २०१४ रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते.लोकप्रतिनिधीही हतबलअमरावती : देवगाव, तळेगाव, सुलतानपुर, नांदगाव खंडेश्वर चौफुली, बडनेरा, अमरावतीमार्गे ३० ते ४० टन रेतीची वाहतूक सुरु झाल्याने रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली. मोठ्या महसुलाची चोरी सुरु आहे. रात्री ट्रक रस्त्यांवरच उभे केले जातात. त्यांना टेललाईट नसल्याने अपघातांची संख्या वाढली, असे अवगत करणारे पत्र आमदारांनी ४ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. या पत्रात रेतीचोरी करणाऱ्या पाच ट्रकचे क्रमांकही नमूद करण्यात आले आहेत. महसूल, गृह आणि परिवहन हे विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करतात. अतिभार वाहतूक त्यामुळे राजरोस सुरु आहे. २ ब्रासपेक्षा अधिक रेती देणाऱ्या घाटांवरच निलंबनाची कारवाई करावी, असे पत्र १ जून २०१५ रोजी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले. या पत्रात घाटांचा उल्लेख आहे.१०० कोटी रूपयांच्या रस्त्यांची हानी होत असल्याचे अभ्यासू पत्र जगताप यांनी २५ मे २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले. महसूल, गृह, परिवहन या विभागांनी एकत्रीतपणे अवैध रेतीवाहतुकीवर कारवाई करावी, असे सूचित केले. या पत्रात रस्ते कुण्या निधीतून आणि किती खर्च करून बांधले, याचा सविस्तर उल्लेख आहे. आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या काही ठळक पत्रांमधील मुद्दे आम्ही लोकदरबारात सादर केले. अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या वीरेंद्र जगतापांनी २० दिवसांपूर्वीपर्यंत पत्रांचा हा सिलसिला जारीच ठेवला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या नाकर्तेपणापुढे वीरेंद्र जगतापांनाही हात टेकवावे लागले.यवतमाळ कलेक्टरकरवी दखलवीरेंद्र जगतापांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही १ जून २०१५ रोजी पत्र लिहिले होते. त्यांनी या संबंधीची दखल घेऊन कळंब आणि बाभुळगाव येथील तहसीलदारांना २४ जून २०१५ रोजी २ ब्रासपेक्षा अधिक रेती वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश लेखी स्वरुपात दिले होते.