शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

महिला लोकशाही दिनात दोनच तक्रारी

By admin | Updated: December 4, 2014 23:01 IST

समस्या पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, समस्या शासकीय पातळीवर सोडविली जावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मार्च २०१३

गजानन मोहोड - अमरावतीसमस्या पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, समस्या शासकीय पातळीवर सोडविली जावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मार्च २०१३ पासून महिला लोकशाही दिन आयोजित केले जाते. प्रत्यक्षात या वर्षात लोकशाही दिनात केवळ २ प्रकरणे दाखल झालीत. यामधील कित्येक महिला लोकशाही दिन निरंक राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांवर अन्याय होत नाहीत किंवा तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे वास्तव प्रामुख्याने पुढे येत आहे. महिलांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत असल्याने तो कमी व्हावा आणि महिलांना न्याय मिळावा यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. ४ मार्च २०१३ पासून शासनाने तालुका जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यास सुरुवात केली. महिलांना शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळावा, त्यांचा हक्क अबाधित रहावा. त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा त्यांच्या तक्रारी शासकीय यंत्रणेकडून सोडविली जावी, समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा व्हावी या हेतूने आयोजित महिला लोकशाही दिनाला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. हे चित्र गंभीर आहे. त्यामुळे अधिकारी व हा विभाग देखील चक्रावून गेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मार्च २०१३ पासून नोव्हेंबर २०१४ पर्यंत झालेल्या २० लोकशाही दिन आयोजित करण्यात आले. यापैकी १२ महिन्यांत एकही तक्रार दाखल नाही. उर्वरित महिन्यांमध्ये १९ प्रकरणे दाखल झालीत. यापैकी ७ प्रकरणे निकषप्राप्त नसल्याने खारीज करण्यात आले. १९ प्रकरणांपैकी १२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व १ प्रकरण चौकशीत आहे. जिल्ह्यातील महिलांवर अत्याचार होतो हे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरुन निदर्शनात येते. मात्र महिलांच्या हक्काच्या संरक्षणार्थ शासनाची प्रभावी यंत्रणा असणाऱ्या महिला लोकशाही दिनात मात्र त्याचवेळी तक्रारींची वानवा आहे. जिल्हास्तर तक्रारी करण्यापूर्वी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनात प्रकरण दाखल करावे लागते. या स्तरावर कित्येक महिला लोकशाही दिन निरंतर राहिले आहे. त्यामुळे समाजातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळण्यासाठी व पीडित महिलांचे समुपदेशन होण्यासाठी महिला लोकशाहीदिन सुदृढ होणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून व्यापक जनजागृती होणे काळाची गरज आहे. तेव्हाच महिला समुपदेशन कार्याला महत्त्व प्राप्त होईल.