शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

महिला लोकशाही दिनात दोनच तक्रारी

By admin | Updated: December 4, 2014 23:01 IST

समस्या पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, समस्या शासकीय पातळीवर सोडविली जावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मार्च २०१३

गजानन मोहोड - अमरावतीसमस्या पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, समस्या शासकीय पातळीवर सोडविली जावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मार्च २०१३ पासून महिला लोकशाही दिन आयोजित केले जाते. प्रत्यक्षात या वर्षात लोकशाही दिनात केवळ २ प्रकरणे दाखल झालीत. यामधील कित्येक महिला लोकशाही दिन निरंक राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांवर अन्याय होत नाहीत किंवा तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे वास्तव प्रामुख्याने पुढे येत आहे. महिलांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत असल्याने तो कमी व्हावा आणि महिलांना न्याय मिळावा यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. ४ मार्च २०१३ पासून शासनाने तालुका जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यास सुरुवात केली. महिलांना शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळावा, त्यांचा हक्क अबाधित रहावा. त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा त्यांच्या तक्रारी शासकीय यंत्रणेकडून सोडविली जावी, समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा व्हावी या हेतूने आयोजित महिला लोकशाही दिनाला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. हे चित्र गंभीर आहे. त्यामुळे अधिकारी व हा विभाग देखील चक्रावून गेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मार्च २०१३ पासून नोव्हेंबर २०१४ पर्यंत झालेल्या २० लोकशाही दिन आयोजित करण्यात आले. यापैकी १२ महिन्यांत एकही तक्रार दाखल नाही. उर्वरित महिन्यांमध्ये १९ प्रकरणे दाखल झालीत. यापैकी ७ प्रकरणे निकषप्राप्त नसल्याने खारीज करण्यात आले. १९ प्रकरणांपैकी १२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व १ प्रकरण चौकशीत आहे. जिल्ह्यातील महिलांवर अत्याचार होतो हे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरुन निदर्शनात येते. मात्र महिलांच्या हक्काच्या संरक्षणार्थ शासनाची प्रभावी यंत्रणा असणाऱ्या महिला लोकशाही दिनात मात्र त्याचवेळी तक्रारींची वानवा आहे. जिल्हास्तर तक्रारी करण्यापूर्वी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनात प्रकरण दाखल करावे लागते. या स्तरावर कित्येक महिला लोकशाही दिन निरंतर राहिले आहे. त्यामुळे समाजातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळण्यासाठी व पीडित महिलांचे समुपदेशन होण्यासाठी महिला लोकशाहीदिन सुदृढ होणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून व्यापक जनजागृती होणे काळाची गरज आहे. तेव्हाच महिला समुपदेशन कार्याला महत्त्व प्राप्त होईल.