शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST

फोटो १३एएमपीएच१५ साहित्य संमेलन ‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रृंखलेतून मुक्त करून उद्घाटन अमरावती : वऱ्हाड विकास व उपेक्षित समाज महासंघातर्फे ...

फोटो १३एएमपीएच१५ साहित्य संमेलन

‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रृंखलेतून मुक्त करून उद्घाटन

अमरावती : वऱ्हाड विकास व उपेक्षित समाज महासंघातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिपर्वाचे औचित्य साधून १० व ११ मार्च रोजी ऑनलाईन बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन पार पडले.

महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रुंखलातून मुक्त करून वासुदेव चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सत्यशोधक व विचारवंत सतीश जामोदकर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन हे धर्मनिरीपेक्ष -प्रजासत्ताक लोकशाहीचा एल्गार बनले आहे. शोषणमुक्त, विषमतामुक्त समाजनिर्मितीचे महात्मा फुले यांचे स्वप्न होते, असे वासुदेव चौधरी म्हणाले. मनुवादी, विषमताधिष्ठित व्यवस्था परिवर्तनासाठी आणि शोषणमुक्त, भयमुक्त व समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी तसेच जाती व धर्मांधतेच्या विषारी चक्रव्यूहांतून बाहेर पडण्यासाठी भारतीयांना फुले-शाहू-आंबेडकरांचे सत्यशोधकी विचारांचीच कास धरावी लागेल, असे परखड मत आयोजक तथा महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बनसोड यांनी मांडले. संचालन प्रभाकर वानखडे यांनी केले. अरुण बुंदेले यांनी स्वागतगीत गायिले. प्रवीण खांडवे यांनी आभार प्रदर्शन केले.

बॉक्स

शेतकऱ्यांचा आसूड व केंद्र सरकारचे कृषी धोरणावर मतांतरे

‘महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड आणि केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण’ या विषयावरील परिसंवादातून ख्यातनाम विचारवंत सुुकुमार पेटकुल, (आदिलाबाद) तसेच प्रदीप शेवतकर यांनी महात्मा फुलेंचे शेती व शेतकरी संदर्भातील विचार आणि केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तसेच शंभर दिवसांपासून न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा परामर्श घेतला. प्रभाकर वानखडे यांनी महात्मा फुलेंचे तत्त्वज्ञान हे समतेची व मानवतेची शिकवण देणारे असल्यामुळे ते प्रत्येकाने आचरण्यात आणण्याची गरज असल्याचे मत मांडले.