शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST

फोटो १३एएमपीएच१५ साहित्य संमेलन ‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रृंखलेतून मुक्त करून उद्घाटन अमरावती : वऱ्हाड विकास व उपेक्षित समाज महासंघातर्फे ...

फोटो १३एएमपीएच१५ साहित्य संमेलन

‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रृंखलेतून मुक्त करून उद्घाटन

अमरावती : वऱ्हाड विकास व उपेक्षित समाज महासंघातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिपर्वाचे औचित्य साधून १० व ११ मार्च रोजी ऑनलाईन बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन पार पडले.

महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रुंखलातून मुक्त करून वासुदेव चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सत्यशोधक व विचारवंत सतीश जामोदकर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन हे धर्मनिरीपेक्ष -प्रजासत्ताक लोकशाहीचा एल्गार बनले आहे. शोषणमुक्त, विषमतामुक्त समाजनिर्मितीचे महात्मा फुले यांचे स्वप्न होते, असे वासुदेव चौधरी म्हणाले. मनुवादी, विषमताधिष्ठित व्यवस्था परिवर्तनासाठी आणि शोषणमुक्त, भयमुक्त व समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी तसेच जाती व धर्मांधतेच्या विषारी चक्रव्यूहांतून बाहेर पडण्यासाठी भारतीयांना फुले-शाहू-आंबेडकरांचे सत्यशोधकी विचारांचीच कास धरावी लागेल, असे परखड मत आयोजक तथा महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बनसोड यांनी मांडले. संचालन प्रभाकर वानखडे यांनी केले. अरुण बुंदेले यांनी स्वागतगीत गायिले. प्रवीण खांडवे यांनी आभार प्रदर्शन केले.

बॉक्स

शेतकऱ्यांचा आसूड व केंद्र सरकारचे कृषी धोरणावर मतांतरे

‘महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड आणि केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण’ या विषयावरील परिसंवादातून ख्यातनाम विचारवंत सुुकुमार पेटकुल, (आदिलाबाद) तसेच प्रदीप शेवतकर यांनी महात्मा फुलेंचे शेती व शेतकरी संदर्भातील विचार आणि केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तसेच शंभर दिवसांपासून न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा परामर्श घेतला. प्रभाकर वानखडे यांनी महात्मा फुलेंचे तत्त्वज्ञान हे समतेची व मानवतेची शिकवण देणारे असल्यामुळे ते प्रत्येकाने आचरण्यात आणण्याची गरज असल्याचे मत मांडले.