शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालाचा पेच सुटला, विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST

(असायमेंट) अमरावती : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची ...

(असायमेंट)

अमरावती : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दहावीच्या निकालासंदर्भात निकालाचे मार्गदर्शन बोर्डाने शिक्षण विभागाला दिलेत. त्यानुसार सर्व शाळेने कार्य पूर्ण करून विद्यार्थ्यांचे गुण पाठविले. आता बारावीच्या निकालाबाबत मूल्यमापनाची पद्धती स्पष्ट झाल्याने कनिष्ठ महाविद्यालयांसह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता मू्ल्यमापन होऊन निकाल लागणार आहे.

आतापर्यंत दरवर्षी बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल जाहीर व्हायचा. मात्र, यंदा सर्व उलट होणार असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाच्या दिरंगाईचा फटका बारावीनंतरच्या शैक्षणिक सत्राला बसणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावी ३०:३०:४० सूत्राने ठरली आहे. यावर्षी बारावीचे प्रात्यक्षिकही झाले नाही. मागील वर्षी अकरावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांचे नुकसान तर होणार नाही ना? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, नव्याने सूत्राने विद्यार्थ्यांच्या डाेक्यावरील चिंतेचे मळभ दूर झाले आहे.

बॉक्स

बारावीसाठी असे होणार गुणदान

कोरोनामुळे राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता गुण देण्याचे सूत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. यासाठी १० वी, ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रात्यक्षिकाच्या आधारे हे गुण दिले जाणार असून यासाठी ३०: ३०: ४० असा फॉर्म्युला आहे. इयत्ता १० वीचे ३० टक्के गुण, इयत्ता ११ वीचे ३० टक्के गुण आणि इयत्ता १२ मधील अंतर्गत परीक्षा व प्रात्याक्षिक असे ४० टक्के गुण विचारात घेतले जाणार आहे.

बॉक्स

गतवर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नाही

१)बारावीच्या निकालाकरिता दहावी, अकरावीतील गुण ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु गतवर्षी कोरोनामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्याच नाहीत.

२)अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारेच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात धक्का देण्यात आला होता. त्यामुळे आता निकाल देताना ३०:३०:४० सूत्र विचारात घतले जाणार आहे.

कोट

विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता

परीक्षा झाली असती तर ज्या प्रमाणात मी अभ्यास केला, त्या प्रमाणात मला गुण मिळाले असते. आज काहीही न करणाऱ्या विद्यार्थ्यालाही चांगले गुण मिळू शकतात, तर ज्याने दिवसरात्र अभ्यास केला त्याचे नुकसानच होणार आहे. म्हणून परीक्षा व्हायला हव्यात. आज माझ्यावर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाला असून, त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत नाही.

- नेहा रोकडे, विद्यार्थिनी.

--------------

कोविडमुळे आमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले. कॉलेज सुरू झाले नसल्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रम आम्ही पूर्ण केला. आम्हाला आता बारावीचे गुण ३०:३०:४० सूत्राच्या आधारे देणार आहे. त्यामुळे तणाव कमी झाला असून, चिंता कमी झाली आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

- रितेश देशमुख, विद्यार्थी.

-------------

पॉईंटर

शाखानिहाय संख्या

विज्ञान00

कला00

व्होकेशनल000

वाणिज्य000

कोट

दहावीला मेरीट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

बारावीतील गुणांच्या आधारे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा घेतली जाते. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीचे ३० टक्के गुण आणि इयत्ता बारावीतील अंतर्गत परीक्षा व प्रात्यक्षिकाचे ४० टक्के गुण विचारात घ्यावे, असे सूतोवाच करण्यात आले. या वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा पूर्णत: अभ्यास झाला नाही.

- नितीन तायडे,

बोर्डाने ३०: ३०: ४० या सूत्राचा अवलंब केल्याने चांगलेच झाले. त्यामुळे बारावीच्या निकालाचा पेच सुटला आहे. आता निकाल तयार करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयालाही अवधी द्यावा लागेल. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवेशापासून बारावीचे विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे.

- रामकृष्ण देशमुख,