शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाचा वळण मार्ग निर्माण होणार

By admin | Updated: April 2, 2015 23:56 IST

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सांैदर्यीकरणात खोडा ठरणारा यवतमाळ वळण मार्ग निर्मितीमधील अडचणी दूर

१९ कोटी रुपये प्राप्त : सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारीअमरावती : बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सांैदर्यीकरणात खोडा ठरणारा यवतमाळ वळण मार्ग निर्मितीमधील अडचणी दूर झाल्या आहेत. राज्य शासनाने अर्थसंकल्पात त्याकरीता १९ कोटी रुपयांची तरतूद केल्याने हा वळण मार्ग लवकरच निर्माण होणार आहे. जळू ते बेलोरा या दरम्यान ३.८० किलोमिटर रस्ता निर्मितीची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग राबविणार आहे.महाराष्ट्र विमानतळ कंपनीला बेलोरा विमानतळावर धावपट्टी, रस्ते निर्मिती, विद्युतीकरण, पाणी पुरवठा आदी महत्त्वाची कामे पूर्ण करुन हे विमानतळ एयरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाला द्यावे लागणार आहे. बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याचा मानस शासनाचा आहे. मात्र, बेलोरा विमानतळवर पायाभूत सुविधा असल्याशिवाय प्रवासी विमाने कशी सुरु करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. २९ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याच्या मोबदल्यात एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दरमहिन्याला एक लाख रुपये देणार आहे. मात्र, बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पूर्ण केल्याशिवाय काहीही शक्य नाही, हे वास्तव आहे. यवतमाळ वळण मार्ग हा अकोला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणे आवश्यक असून ते काम पूर्ण झाल्याशिवाय विमानतळाचे विस्तारीकरण करता येणार नाही, ही बाब बेलोरा विमानतळाच्या प्रबंधकांनी शासनाला कळविली आहे. प्रवासी विमाने सुरू करण्याची लगबगबेलोरा विमानतळावरुन देशातंर्गत प्रवासी विमाने सुरु करण्याची लगबग एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाची आहे. विमानतळावर पायाभूत सुविधा पूर्ण होताच बेलोरा विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ताब्यात घेतले जाणार आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय देखील पारित करण्यात आला आहे. केवळ विमानतळावर पायाभूत सोयी सुविधांची प्रतीक्षा आहे.ना. फडणवीस, ना. गडकरींचा दौरामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी हे अमरावतीत १० व ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या कृषी मेळाव्याला विमानाने येत असल्याचा पार्श्वभूमीवर विमानतळ प्रबंधकांनी व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. धावपट्टी, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा आदीबाबत उणीवा राहू नये, याची दक्षता घेतली आहे. अद्यापर्यंत गडकरी, फडणवीस यांचा दौरा आला नसला तरी संभावित दौरा निश्चित होईल, असे संकेत आहे.बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याचे धोरण आहे. त्यानुसार शासन निर्णय असून विमानतळावर पायाभूत सोयीसुविधा निर्मितीवर भर दिल्या जात आहे. १९ कोटी रुपये प्राप्त झाल्यामुळे वळण मार्ग निर्मितीतील अडचणी दूर झाल्या आहेत. धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे आहे.एम.पी. पाठकप्रबंधक, बेलोरा विमानतळ