शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

चुकीच्या धोरणामुळे उद्योग व्यापारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:40 IST

नोटबंदी, जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे व शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग व व्यापारी अडचणीत आले आहे. मात्र, शासन पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देरावसाहेब शेखावत यांची टीका : ‘काँग्रेस आपल्या दारी’ अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटबंदी, जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे व शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग व व्यापारी अडचणीत आले आहे. मात्र, शासन पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी केली.व्यापारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्यावतीने ‘काँग्रेस आपल्या दारी अभियान’ गुरुवार, १७जानेवारीपासून राबविण्यात येत आहे. सकाळी १०.३० वाजता दरम्यान माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या काँग्रेसनगर येथील निवासस्थानी काही निवडक व्यापाऱ्यांची व काँग्रेसच्या पदाधिकाºयांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याप्रसंगी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय वाघ, पुरुषोत्तम मुंदडा, शहर काँग्रेसचे महासचिव सुरेंद्र देशमुख, मनोज भेले, आनंद बाबू भांबोरे, राजेंद्र लुनावत, राधेश्याम लढढा, सुरेश रताव, ओमप्रकाश चांडक, नवनीत मोहोड, बापूशेठ खंडेलवाल, अजय छतवाणी अनिल, माधवगढिया, राजेंद्र अन्सारी यांच्यासह अनेक व्यापाºयांची येथे उपस्थिती होती. नोटबंदी, जीएसटी, आॅनलाईन व्यापार व एफडीआय, प्लॅस्टिक बंद व कॅशलेस व्यवहार व बँकींमुळे अनेकांच्या अडचणी वाढल्याचा सुरू बैठकीत निघाला आहे.आॅनलाईन व्यापार व एफडीएमुळे लहान व्यापारी संपले आहेत. चुकीच्या धोरणामुळे व्यापार व उद्योग डबघाईस आले. शासनाने लादलेल्या प्लास्टिक बंदीमुळे राज्यातील लघु उद्योग व्यापार संपुष्टात आले. तसेच बेरोजगारी वाढली. कॅशलेस व्यवहार बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार अडचणीत आले. देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याची प्रतिक्रिया सुरेंद्र देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. व्यापार, शेतकरी व किरकोळ व्यावसाय मोडकळीस आलेला आहे महाराष्ट्रातील लघुउद्योग संपुष्टात येत असून बेरोजगारीत वाढ होत आहे तसेच यामुळे व्यापारी कारखानदार विद्यार्थी व जनता त्रस्त झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाला शिकण्यासाठी हे अभियान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काँग्रेस आपल्या दारी येत असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.नोटबंदी हा देशाला झटकानोटबंदी हा देशाला पहिला झटका होता. नोटबंदीमुळे सरकारला काय लाभ मिळाला माहिती नाही. त्या कारणाने सर्व व्यापार कोडमोडले. कुठलीही जनजागृती न करता पर्यावणाच्या नावावर प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला. प्लॅस्टिक बंदी झाल्याने त्यावर अवलंबुन असणारे अनेक उद्योग बंद झाले. यामुळे बेरोजगारी वाढली. शासन उद्योगही आणत नाही. व रोजगारही देत नाही. जे उद्योग सुरु आहेत. ते अशा जाचक निर्णय घेवून बंद पडत आहेत. मात्र अंबानी, चोकसी सारख्यांची पावते. लहान व्यापाºयांकडे उद्योगांकडे मात्र शासनाची लक्ष नसल्याचा आरोप यावेळी लोकमतशी बोलताना माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला आहे.

टॅग्स :GSTजीएसटीNote Banनोटाबंदी