शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"नभ अंकुरले"कार तुळशीराम काजे काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:17 IST

जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देजुन्या पिढीतील कवीअमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पुसनेर येथे अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली. वर्षभरापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून ते अंथरूणावर खिळले होते. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांनी अमरावती येथील झेंडा चौकातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पुसनेर येथे जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.तुळशीराम माधवराव काजे यांचा जन्म १८ मार्च १९३२ रोजी पुसनेर या लहानशा खेडेगावात झाला. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून त्यांनी एम.ए. (मराठी), बी.एड.चे शिक्षण घेतले. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील लोणी येथे त्यांनी माध्यमिक शिक्षकाची नोकरी केली. दरम्यान काजे यांचा १९५८ साली नभ अंकुरले हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. दुसरा काव्यसंग्रह भ्रमिष्टाचे शोकगीत हा १९८३ मध्ये तर काहुरभैरवी तिसरा काव्यसंग्रह २००७ मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाने १९८४ साली तुळशीराम काजे यांना केशवसूत पुरस्काराने सन्मानित केले आहे. भ्रमिष्टाचे शोकगीत या काव्यसंग्रहाने त्यांचे नाव सर्वदूर प्रसिद्ध झाले. काजे यांनी १९५९ मध्ये धारा त्रैमासिकाचे प्रकाशन केले. मात्र, काही अडचणींमुळे ते फार काळ प्रसिद्ध करू शकले नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यासमंडळात १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी तज्ञ्ज म्हणून काम केले. अमरावती येथील मराठी जनसाहित्य परिषदेचे अध्यक्षपद सन १९९० ते २००२ पर्यंत त्यांनी भूषविले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे २००२ साली झालेल्या सातव्या मराठी जनसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरादेखील त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. लोकमत, अक्षर वैदर्भी आणि मौज' या दिवाळी अंकात काजे यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. काजे यांनी कसोशीने, ओंजळीतल्या दिव्याप्रमाणे कविता जपली. संपूर्ण आयुष्य त्यांनी कवितेला समर्पित केले.काजे यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. साहित्य क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पुसनेर येथे धाव घेतली. त्यांच्या पश्र्चात पत्नी विमल, मानस मुलगी अलका उगले व नातू सुमित उगले आहेत.

टॅग्स :literatureसाहित्य