शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विजयच्या पत्रातून उघड होणार सत्य

By admin | Updated: April 5, 2017 00:05 IST

जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या विरुळपूर्णा येथील विजय नांदणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेला १२ दिवस झाले आहेत.

विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी सुमित हरकुट चांदूरबाजारजिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या विरुळपूर्णा येथील विजय नांदणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेला १२ दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या घटनेतील सत्य अद्याप उघड व्हायचे आहे. याप्रकरणी शाळेतील मुख्याध्यापक अमोल माकोडे व वर्गशिक्षक शिंगणे यांची दररोज चौकशीसाठी ठाण्यात बोलावले जात आहे. मृत्यूपूर्व विजयने लिहिलेल्या पत्रातील अक्षराचा तपासणी अहवाल मिळाल्यानंतरच या घटनेतील सत्य समोर येणार आहे. तर मृत विजय नांदणे व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील विरुळपूर्णा या गावात इयत्ता नववीतील १५ वर्षीय विद्यार्थी विजय नांदणे याने येथील एका शेतशिवारात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २४ मार्च रोजी उघडकीस आली होती. विजय जवळ मृत्यूपूर्व लिहिलेले एक पत्र आढळून आले होते. वर्गातील चार विद्यार्थी त्याला चिडवीत होते, तर शिक्षक मारहाण करीत असल्याने कंटाळून विजयने आत्महत्या केल्याची तक्रार त्याचे वडील सुधाकर नांदणे यांनी आसेगाव पोलिसांत केली होती. या प्रकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्चला मृत विजयच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी चिडविले होते. याची तक्रार त्याने वर्गशिक्षक शिंगणे व मुख्याध्यापक अमोल माकोडे यांच्याकडे केली होती. यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांनी चिडविणाऱ्या चारही विद्यार्थ्यांसह मृत विजयला कानशिलात लगावत शिक्षा केली होती. याची माहिती विजयने आईला दिली होती. त्याच्या आईने वर्गशिक्षकांची भेट घेऊन या प्रकारची विचारणा केली होती. दुसऱ्या दिवशी विजय नेहमीप्रमाणे शाळेत गेला. मात्र मधल्या सुटीनंतर तो घरी परत आला व एका शेतात जाऊन त्याने विष प्राशन केले. आत्महत्या केल्याच्या दिवशी विजयला मारले नव्हेत, असा बयाण शाळेच्या शिक्षकांनी दिला आहे. मात्र असे काय घडले की, यामुळे विजयला आत्महत्या करावी लागली याचा अद्याप पत्ता लागला नाही. मृत विजय जवळ मिळालेले पत्रदेखील पोलिसांसाठी संशयास्पद आहे. विजयची अक्षरे व पत्रात लिहलेल्या अक्षरांमध्ये असलेले साम्य पडताळण्यासाठी हस्तलिखित तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे२४ मार्चला आत्महत्येनंतर शामकांत बोबडे विद्यालय ४ दिवस बंद असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात निवेदन विजयच्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. घटनेचा तपास आसेगावचे पीआय अजय आखरे करीत आहे. - तर आत्महत्या टळली असतीविजय नांदणे याच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे. विजयच्या आत्महत्येची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करीत त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांविषयी अनेक तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची योग्य समजूत घातली असती तर विजय आज जिवंत असता असेही मत गावातील अनेकांनी नोंदविले. विजय नांदणे याच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. मृत्यूपूर्व त्याने लिहिलेल्या पत्रातील अक्षरे त्याचीच आहेत काय? याची तपासणी करण्यासाठी आम्ही पाठविली आहे. तपासणीचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करू.- अजय आखरे, पोलीस निरीक्षक, आसेगाव