शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय ...

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापत आहे. अशातच आता जिल्ह्यात ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत संबंधित ग्रामपंचायतींची सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेसाठी पहिली सभा घेण्यात येणार आहे. यासाठी अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २ व ४ फेब्रुवारीला १४ तालुक्यात पार पडली. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे गावोगावी सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांना उत्सुकता लागली होती. परिणामी गावोगावी राजकीय डावपेचांना वेग आला आहे. काही गावांमध्ये एका पॅनेलला बहुमत असले तरी सरपंचपदाचा उमेदवार अन्य विरोधी पॅनेल जवळ असल्याने फोडोफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. याकरिता गावागावांत राजकीय नेते व पॅनेलप्रमुख वॉच ठेवून आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० व ३३ नूसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनूसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी १४ तहसीलदारांना दिले आहेत.

बॉक्स

अशी आहे तालुकानिहाय निवडणूक तारीख

भातकुली तालुक्यात ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान, तिवसा व चांदूर रेल्वे ११ ते १५, मोर्शी व अंजनगाव सुर्जी ११ ते १६, धारणी ११ ते १७, अमरावती, चांदूर बाजार, चिखलदरा, वरूड, अचलपूर व दर्यापूर ११ ते १७, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक होणार आहे.

बॉक्स

राजकीय घडामोडीना वेग

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आटोपताच आता निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ५५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचे वेध लागले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी गावपुढाऱ्याच्या राजकीय व्युहरचना आखण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे.