शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय ...

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापत आहे. अशातच आता जिल्ह्यात ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत संबंधित ग्रामपंचायतींची सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेसाठी पहिली सभा घेण्यात येणार आहे. यासाठी अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २ व ४ फेब्रुवारीला १४ तालुक्यात पार पडली. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे गावोगावी सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांना उत्सुकता लागली होती. परिणामी गावोगावी राजकीय डावपेचांना वेग आला आहे. काही गावांमध्ये एका पॅनेलला बहुमत असले तरी सरपंचपदाचा उमेदवार अन्य विरोधी पॅनेल जवळ असल्याने फोडोफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. याकरिता गावागावांत राजकीय नेते व पॅनेलप्रमुख वॉच ठेवून आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० व ३३ नूसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनूसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी १४ तहसीलदारांना दिले आहेत.

बॉक्स

अशी आहे तालुकानिहाय निवडणूक तारीख

भातकुली तालुक्यात ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान, तिवसा व चांदूर रेल्वे ११ ते १५, मोर्शी व अंजनगाव सुर्जी ११ ते १६, धारणी ११ ते १७, अमरावती, चांदूर बाजार, चिखलदरा, वरूड, अचलपूर व दर्यापूर ११ ते १७, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक होणार आहे.

बॉक्स

राजकीय घडामोडीना वेग

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आटोपताच आता निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ५५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचे वेध लागले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी गावपुढाऱ्याच्या राजकीय व्युहरचना आखण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे.