शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

जिल्हा परिषदेत बदल्यांचा बिगूल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ...

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत १० टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या ३१ जुलैपर्यंत व त्यानंतर १० टक्के विशेष बदल्या आयुक्तांच्या मान्यतेने १४ ऑगस्टपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाचे आदेशानुसार जिल्हा परिषद सीईओंनी झेडपीच्या गट ‘क’ आणि गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ जुलै रोजी प्रशासकीय कामकाजाची कार्यसूची जाहीर केले आहे.त्यामुळे मिनीमंत्रालयात बदल्याची धूम राहणार आहे.

दरवर्षी जून पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पार पडते. मात्र यावर्षी कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने काही अपवाद वगळता इतर सर्व प्रकारचे बदल यांना ३० जूनपर्यत स्थगिती दिली होती. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही बदल्या होणार नाहीत असा अंदाज असताना सामान्य प्रशासन विभागाने बदलांबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने १५ टक्के सामान्य बदल्या करण्याची परवानगी जिल्हा परिषदेला दिली आहे.त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचे मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १६ ते २२ जुलै पर्यत बदली प्रक्रियेसाठीची आवश्यक कारवाई केली जाणार आहे.त्यानंतर २६ जुलै पासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे समुपदेश होणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

बदली प्रक्रियेची कार्यसुची जाहीर

जिल्हा परिषद कर्मचारी बदलीप्रक्रीये करीता संवर्ग निहाय अंतरिम एकत्रित वास्तव्य सेवाज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिध्द करणे १६ जुलै,विनंती अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १९ जुलै,अंतिम वास्तव्य सेवाज्येष्ठता यादीवर आक्षेप व सूचना मागविणे २० जुलै,आक्षेप व सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे २२ जुलै या प्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यसूची सीईओंनी जाहीर केली आहे.

बॉक्स

२६ ते २८ जुलै दरम्यान बदल्या ?

जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्याची कारवाई सुरू केली आहे.१६ ते २२ जुलै पर्यत बदल्यासंदर्भात प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. यानंतर २६ ते २८ जुलै पर्यत बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रत्यक्ष कारवाई ही समुपदेशनाव्दारे पार पडणार असल्याचे संकेत आहेत.