शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

जिल्हा परिषदेत बदल्यांचा बिगूल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ...

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत १० टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या ३१ जुलैपर्यंत व त्यानंतर १० टक्के विशेष बदल्या आयुक्तांच्या मान्यतेने १४ ऑगस्टपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाचे आदेशानुसार जिल्हा परिषद सीईओंनी झेडपीच्या गट ‘क’ आणि गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ जुलै रोजी प्रशासकीय कामकाजाची कार्यसूची जाहीर केले आहे.त्यामुळे मिनीमंत्रालयात बदल्याची धूम राहणार आहे.

दरवर्षी जून पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पार पडते. मात्र यावर्षी कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने काही अपवाद वगळता इतर सर्व प्रकारचे बदल यांना ३० जूनपर्यत स्थगिती दिली होती. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही बदल्या होणार नाहीत असा अंदाज असताना सामान्य प्रशासन विभागाने बदलांबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने १५ टक्के सामान्य बदल्या करण्याची परवानगी जिल्हा परिषदेला दिली आहे.त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचे मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १६ ते २२ जुलै पर्यत बदली प्रक्रियेसाठीची आवश्यक कारवाई केली जाणार आहे.त्यानंतर २६ जुलै पासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे समुपदेश होणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

बदली प्रक्रियेची कार्यसुची जाहीर

जिल्हा परिषद कर्मचारी बदलीप्रक्रीये करीता संवर्ग निहाय अंतरिम एकत्रित वास्तव्य सेवाज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिध्द करणे १६ जुलै,विनंती अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १९ जुलै,अंतिम वास्तव्य सेवाज्येष्ठता यादीवर आक्षेप व सूचना मागविणे २० जुलै,आक्षेप व सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे २२ जुलै या प्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यसूची सीईओंनी जाहीर केली आहे.

बॉक्स

२६ ते २८ जुलै दरम्यान बदल्या ?

जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्याची कारवाई सुरू केली आहे.१६ ते २२ जुलै पर्यत बदल्यासंदर्भात प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. यानंतर २६ ते २८ जुलै पर्यत बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रत्यक्ष कारवाई ही समुपदेशनाव्दारे पार पडणार असल्याचे संकेत आहेत.