शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

४० गावांतील आदिवासींनी घेतला सुटकेचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:04 IST

जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देपाहुणी स्थिरावलीच नाही : विघ्न टळल्याने श्रीगणेशाचे आगमन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : भारतीय संस्कृतीत ‘अतिथी देवो भव:’ असे सुभाषित आहे. दोन महिन्यांपूर्वी मेळघाटच्या जंगलात आलेल्या पाहुणीने सळो की पळो करून सोडल्यानंतर मात्र यजमानांनाच भीती दाटून आली. एक दोन नव्हे, जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.एक वाघिण काय करू शकते, तिची दहशत कशी असते, याचा प्रत्यय मेळघाटच्या केकदाखेडा, दादरा, कावडाझिरी, खिडकी, रबांग, धोतरा, बिबामल, भादुबल्डा, कंजोली, राणीगाव, रानापिसा, भवर, रेहट्या, हिराबम्बई, शिवाझरी, डोलार, भांडुम, बैराटेकी, बोरखेडा, गडगामालूर, झिलांगपाटी, तातर, परसोली यांसह तब्बल ४० गावांतील हजारो आदिवासींना आला. ई-वन वाघिणीने पाळीव जनावरांवर हल्ला करण्यासोबत एका आदिवासीचा बळी घेतल्याने समस्थ आदिवासी बांधव प्रचंड दहशतीत आले होते. अगदी गरजच आहे म्हणून शेतात गेलेले आदिवासी सायंकाळपूर्वी घरी परतत होते. रात्रीही घराचा दरवाजा बंद केल्याची चारदा खातरजमा करीत होते. दोन महिन्यांत दुग्ध व्यवसाय आणि सर्वच कामे ठप्प पडली होती. आदिवासींमध्ये वाघिणीसोबतच व्याघ्र प्रकल्पाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. खासदार नवनीत राणा, मेळघाटातील आजी-माजी आमदारांनी या गंभीर प्रश्नांची मांडणी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयात केली होती. आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सबब, एकाचा बळी गेल्यानंतर मुक्त संचारासाठी सोडण्यात आलेल्या वाघिणीला रविवारी जेरबंद करून गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात नेण्यात आले.गणपती बाप्पा... मोरया!रविवारपर्यंत मेळघाटातील आदिवासी खेडी ई-वन वाघिणीच्या दहशतीत होती. तिला पकडून गोरेवाडा येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळताच सोमवारी दहशतीखाली असलेल्या गावांमध्ये गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. विघ्नहर्त्यानेच विघ्न दूर केल्याचा आनंद आदिवासींच्या चेहºयावर झळकत होता.दोन महिन्यांपासून आदिवासी वाघिणीच्या दहशतीत होते. रविवारी सायंकाळी गोलाई गावानजीक तिला पकडल्याची माहिती मिळाल्याने मोठे संकट टळले. आम्ही हर्षाने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.- सविता जावरकर सरपंच, रबांगवाघिणीच्या दहशतीमुळे दैनंदिन कामकाज खोळंबले. मजुरी, शेती, चाºयाचा प्रश्न गंभीर झाला होता. रात्रीप्रमाणेच दिवसाही नागरिक घराबाहेर निघण्यास धजावत नव्हते. तिला जेरबंद केल्याने आमचा जीव भांड्यात पडला.गोपाल धुर्वे, उपसरपंच, मोर्गदा

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास