शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

४० गावांतील आदिवासींनी घेतला सुटकेचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:04 IST

जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देपाहुणी स्थिरावलीच नाही : विघ्न टळल्याने श्रीगणेशाचे आगमन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : भारतीय संस्कृतीत ‘अतिथी देवो भव:’ असे सुभाषित आहे. दोन महिन्यांपूर्वी मेळघाटच्या जंगलात आलेल्या पाहुणीने सळो की पळो करून सोडल्यानंतर मात्र यजमानांनाच भीती दाटून आली. एक दोन नव्हे, जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.एक वाघिण काय करू शकते, तिची दहशत कशी असते, याचा प्रत्यय मेळघाटच्या केकदाखेडा, दादरा, कावडाझिरी, खिडकी, रबांग, धोतरा, बिबामल, भादुबल्डा, कंजोली, राणीगाव, रानापिसा, भवर, रेहट्या, हिराबम्बई, शिवाझरी, डोलार, भांडुम, बैराटेकी, बोरखेडा, गडगामालूर, झिलांगपाटी, तातर, परसोली यांसह तब्बल ४० गावांतील हजारो आदिवासींना आला. ई-वन वाघिणीने पाळीव जनावरांवर हल्ला करण्यासोबत एका आदिवासीचा बळी घेतल्याने समस्थ आदिवासी बांधव प्रचंड दहशतीत आले होते. अगदी गरजच आहे म्हणून शेतात गेलेले आदिवासी सायंकाळपूर्वी घरी परतत होते. रात्रीही घराचा दरवाजा बंद केल्याची चारदा खातरजमा करीत होते. दोन महिन्यांत दुग्ध व्यवसाय आणि सर्वच कामे ठप्प पडली होती. आदिवासींमध्ये वाघिणीसोबतच व्याघ्र प्रकल्पाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. खासदार नवनीत राणा, मेळघाटातील आजी-माजी आमदारांनी या गंभीर प्रश्नांची मांडणी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयात केली होती. आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सबब, एकाचा बळी गेल्यानंतर मुक्त संचारासाठी सोडण्यात आलेल्या वाघिणीला रविवारी जेरबंद करून गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात नेण्यात आले.गणपती बाप्पा... मोरया!रविवारपर्यंत मेळघाटातील आदिवासी खेडी ई-वन वाघिणीच्या दहशतीत होती. तिला पकडून गोरेवाडा येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळताच सोमवारी दहशतीखाली असलेल्या गावांमध्ये गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. विघ्नहर्त्यानेच विघ्न दूर केल्याचा आनंद आदिवासींच्या चेहºयावर झळकत होता.दोन महिन्यांपासून आदिवासी वाघिणीच्या दहशतीत होते. रविवारी सायंकाळी गोलाई गावानजीक तिला पकडल्याची माहिती मिळाल्याने मोठे संकट टळले. आम्ही हर्षाने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.- सविता जावरकर सरपंच, रबांगवाघिणीच्या दहशतीमुळे दैनंदिन कामकाज खोळंबले. मजुरी, शेती, चाºयाचा प्रश्न गंभीर झाला होता. रात्रीप्रमाणेच दिवसाही नागरिक घराबाहेर निघण्यास धजावत नव्हते. तिला जेरबंद केल्याने आमचा जीव भांड्यात पडला.गोपाल धुर्वे, उपसरपंच, मोर्गदा

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास