शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

यूपीएससी प्रशिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांना तोकड्या जागा; ५०० ऐवजी १०० जागांवर बोळवण

By गणेश वासनिक | Updated: March 11, 2023 22:05 IST

ट्रायबल फोरम आक्रमक, आदिवासी मंत्री, आयुक्तांना जागावाढीसाठी साकडे

अमरावती : संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठविण्यात येत असलेल्या आदिवासी विद्यार्थी क्षमतेत वाढ करणे काळाची गरज आहे. तथापि, राज्य शासनाने यूपीएससी प्रशिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थी संख्या केवळ १०० एवढीच निश्चित केली आहे. हा आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय असून, भविष्याचा वेध लक्षात घेता यूपीएससी प्रशिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थी ५०० करण्यात यावी, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.

दऱ्या, खोऱ्यात, वस्ती, वाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याच्या स्वप्नपूर्ती यूपीएससीच्या कोचिंगमध्ये ५०० संख्या करणे आवश्यक आहे. नुकतेच राज्य शासनाने यूपीएससी प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे पाठविल्या जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची क्षमता १०० एवढी निश्चित केली आहे. ही संख्या तोकडी असल्यामुळे यूपीएससी प्रशिक्षणामध्ये जाणाऱ्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. यूपीएससी प्रशिक्षणाची संख्या १०० ऐवजी ५०० करण्यात यावी, अशी मागणी अशी मागणी आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचेकडे ट्रायबल फोरमने केली आहे.बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर ‘ट्रायबल’चे नियोजन

बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर प्रथमतःच गतवर्षी टीआरटीआयने यूपीएससीच्या कोचिंगसाठी दिल्लीला पाठविण्यासाठी आदिवासी समाजाच्या १०० विद्यार्थ्यांची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत हजारोंच्या संख्येने आदिवासी विद्यार्थी आपल्या गतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी निर्धारित केलेली १०० विद्यार्थी क्षमता ही अगदीच नगण्य आहे.यूपीएससी प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे ५०० विद्यार्थी क्षमतेची आमची जुनी मागणी आहे. पण आदिवासी विकास विभागाने केवळ १०० विद्यार्थ्यांसाठी योजना तयार केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्यात यावी म्हणून पुन्हा मागणी करण्यात आली आहे.- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगAmravatiअमरावती