शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

यूपीएससी प्रशिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांना तोकड्या जागा; ५०० ऐवजी १०० जागांवर बोळवण

By गणेश वासनिक | Updated: March 11, 2023 22:05 IST

ट्रायबल फोरम आक्रमक, आदिवासी मंत्री, आयुक्तांना जागावाढीसाठी साकडे

अमरावती : संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठविण्यात येत असलेल्या आदिवासी विद्यार्थी क्षमतेत वाढ करणे काळाची गरज आहे. तथापि, राज्य शासनाने यूपीएससी प्रशिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थी संख्या केवळ १०० एवढीच निश्चित केली आहे. हा आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय असून, भविष्याचा वेध लक्षात घेता यूपीएससी प्रशिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थी ५०० करण्यात यावी, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.

दऱ्या, खोऱ्यात, वस्ती, वाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याच्या स्वप्नपूर्ती यूपीएससीच्या कोचिंगमध्ये ५०० संख्या करणे आवश्यक आहे. नुकतेच राज्य शासनाने यूपीएससी प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे पाठविल्या जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची क्षमता १०० एवढी निश्चित केली आहे. ही संख्या तोकडी असल्यामुळे यूपीएससी प्रशिक्षणामध्ये जाणाऱ्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. यूपीएससी प्रशिक्षणाची संख्या १०० ऐवजी ५०० करण्यात यावी, अशी मागणी अशी मागणी आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचेकडे ट्रायबल फोरमने केली आहे.बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर ‘ट्रायबल’चे नियोजन

बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर प्रथमतःच गतवर्षी टीआरटीआयने यूपीएससीच्या कोचिंगसाठी दिल्लीला पाठविण्यासाठी आदिवासी समाजाच्या १०० विद्यार्थ्यांची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत हजारोंच्या संख्येने आदिवासी विद्यार्थी आपल्या गतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी निर्धारित केलेली १०० विद्यार्थी क्षमता ही अगदीच नगण्य आहे.यूपीएससी प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे ५०० विद्यार्थी क्षमतेची आमची जुनी मागणी आहे. पण आदिवासी विकास विभागाने केवळ १०० विद्यार्थ्यांसाठी योजना तयार केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्यात यावी म्हणून पुन्हा मागणी करण्यात आली आहे.- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगAmravatiअमरावती