शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 12:48 IST

ट्रायबल फोरमने आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देतीन सदस्यांच्या निवडीवर आक्षेप

गणेश वासनिक

अमरावती : राज्य शासनाने २३ जुलै २०२० रोजी जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना केली. आजपर्यंत या परिषदेची एकही बैठक झालेली नसली, तरी ही परिषद वादात अडकली आहे. ‘ट्रायबल फोरम’ अमरावती विभागाच्या अध्यक्षांनी जनजाती सल्लागार परिषदेच्या तीन सदस्यांबाबत आक्षेप घेत थेट राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

संविधानातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात ही परिषद अस्तित्वात आहे. राज्य शासनाने या परिषदेची पुनर्रचना करून त्यात २० जणांना स्थान दिले. यात मुख्यमंत्री हे अध्यक्ष, आदिवासी विकास मंत्री हे उपाध्यक्ष तर आदिवासी विकास विभागाचे सचिव हे पदसिद्ध सचिव आहेत. याशिवाय काही आमदारांसह १७ जणांचा सदस्य म्हणून परिषदेत समावेश आहे. मात्र, आमदार लता सोनवणे, मिलिंद थत्ते आणि डॉ. आर. के. मुटाटकर या तीन नावांवर ट्रायबल फोरमने आक्षेप घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे. ज्याप्रमाणे राज्य शासन मागासवर्ग आयोग, अनुसूचित जाती आयोगाच्या तज्ज्ञ सदस्यांची निवड करताना वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाणकार व्यक्तींचे नामांकन मागविते, तीच पद्धत जनजाती सल्लागार परिषदेसाठी अवलंबावी आणि योग्य आदिवासी व्यक्ती किंवा महिलेची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी रितेश परचाके यांनी केली आहे.

या तीन नावांवर असे आहेत आक्षेप

- लता सोनवणे : या महिला आमदार अनुसूचित जमातीच्या नाहीत. नंदुरबार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचा टोकरे कोळी जातीचा दावा ९ फेब्रुवारी २०२० रोजी अवैध ठरवला असून, उपविभागीय अधिकारी, अमळनेर (जिल्हा जळगाव) यांनी टोकरे कोळी जमातीचे दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त केले आहे.

- मिलिंद थत्ते : वयम या संघटनेशी निगडित असलेले थत्ते बिगर आदिवासी असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. आदिवासी विकासात त्यांचे योगदान नाही.

- आर. के. मुटाटकर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आदिवासी विषयांवर केलेल्या संशोधन प्रकल्पांवर अधिसभा व संशोधन परिषदेने आक्षेप घेतला आहे. ‘उत्थान’ कार्यक्रमात शासनाचा कोट्यवधींचा निधी स्वत:च्या संस्थेमार्फत खर्च करून अहवाल दिला नाही.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिकAmravatiअमरावती