शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 12:48 IST

ट्रायबल फोरमने आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देतीन सदस्यांच्या निवडीवर आक्षेप

गणेश वासनिक

अमरावती : राज्य शासनाने २३ जुलै २०२० रोजी जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना केली. आजपर्यंत या परिषदेची एकही बैठक झालेली नसली, तरी ही परिषद वादात अडकली आहे. ‘ट्रायबल फोरम’ अमरावती विभागाच्या अध्यक्षांनी जनजाती सल्लागार परिषदेच्या तीन सदस्यांबाबत आक्षेप घेत थेट राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

संविधानातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात ही परिषद अस्तित्वात आहे. राज्य शासनाने या परिषदेची पुनर्रचना करून त्यात २० जणांना स्थान दिले. यात मुख्यमंत्री हे अध्यक्ष, आदिवासी विकास मंत्री हे उपाध्यक्ष तर आदिवासी विकास विभागाचे सचिव हे पदसिद्ध सचिव आहेत. याशिवाय काही आमदारांसह १७ जणांचा सदस्य म्हणून परिषदेत समावेश आहे. मात्र, आमदार लता सोनवणे, मिलिंद थत्ते आणि डॉ. आर. के. मुटाटकर या तीन नावांवर ट्रायबल फोरमने आक्षेप घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे. ज्याप्रमाणे राज्य शासन मागासवर्ग आयोग, अनुसूचित जाती आयोगाच्या तज्ज्ञ सदस्यांची निवड करताना वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाणकार व्यक्तींचे नामांकन मागविते, तीच पद्धत जनजाती सल्लागार परिषदेसाठी अवलंबावी आणि योग्य आदिवासी व्यक्ती किंवा महिलेची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी रितेश परचाके यांनी केली आहे.

या तीन नावांवर असे आहेत आक्षेप

- लता सोनवणे : या महिला आमदार अनुसूचित जमातीच्या नाहीत. नंदुरबार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचा टोकरे कोळी जातीचा दावा ९ फेब्रुवारी २०२० रोजी अवैध ठरवला असून, उपविभागीय अधिकारी, अमळनेर (जिल्हा जळगाव) यांनी टोकरे कोळी जमातीचे दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त केले आहे.

- मिलिंद थत्ते : वयम या संघटनेशी निगडित असलेले थत्ते बिगर आदिवासी असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. आदिवासी विकासात त्यांचे योगदान नाही.

- आर. के. मुटाटकर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आदिवासी विषयांवर केलेल्या संशोधन प्रकल्पांवर अधिसभा व संशोधन परिषदेने आक्षेप घेतला आहे. ‘उत्थान’ कार्यक्रमात शासनाचा कोट्यवधींचा निधी स्वत:च्या संस्थेमार्फत खर्च करून अहवाल दिला नाही.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिकAmravatiअमरावती