शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

१०० वर आदिवासींना डायरियाची लागण

By admin | Updated: May 23, 2016 00:14 IST

तालुक्यातील बागलिया येथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने १०० वर आदिवासींना शनिवारपासून अतिसाराची लागण झाली आहे.

नरेंद्र जावरे चिखलदरातालुक्यातील बागलिया येथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने १०० वर आदिवासींना शनिवारपासून अतिसाराची लागण झाली आहे. त्यापैकी चार गंभीर रूग्णांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेतर्फे जिल्हा परिषद शाळेत रूग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचाराकरिता रुग्णांना बाहेर पाठविण्यासाठी रविवारी दुपारी आदिवासींनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता त्यांना उपचारासाठी बाहेर पाठविण्यात येत आहे. तहसीलदार किशोर बागडे स्वत: तळ ठोकून असून परिस्थिती नियंत्रणात आहे. बागलिया येथे एक हातपंप व विहिरीचे पाणी आदिवासी पिण्यासाठी वापरतात. पाण्याची पातळी खाली गेल्याने विहिरीतील झऱ्यातून पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहे. परिणामी गढूळ पाण्यावर बागलियावासियांना तहान भागवावी लागत आहे. शनिवारी दुपारी ११ वाजतानंतर गावकऱ्यांना अचानक उलटी व शौचाचा त्रास सुरु झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे. घराघरातून रुग्ण निघू लागल्याने टेंभ्रुसोडा प्राथमिक आरोग्य केंद्राला गावकऱ्यांनी तशी माहिती दिली.बागलिया येथील लोकसंख्या ७८० इतकी आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता शनिवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य यंत्रणेने दवाखाना सुरु केला.टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस.एस.मरसकोल्हे, रोहन गिते, अमित गिते, अकुंश मानकर या चार डॉक्टरांची चमू रुग्णांवर उपचार करीत असून सुरेंद्र गैलवार, खंडारे, अरविंद पिहुलकर, डाबर, ज्योती साखरे, पट्टे, भोसले, गडिलेवाल आदी आरोग्य कर्मचारी तळ ठोकून आहेत. बागलिया येथील सचिव तायडे गावात राहत नसल्याने दूषित पाण्याचा वापर गावकऱ्यांना करावा लागला. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अतिसारची लागण झाल्याचे आदिवासींचे म्हणणे होते. सचिवावर कारवाईची मागणी त्यांनी केली. दूषित पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.हे आहेत अतिसाराचे रुग्णराखी धांडेकर (१६), मालती धांडेकर (१८), रोहिणी बेलसरे ११, दिनेश धांडेकर २३, पार्वती भास्कर ४५, फुलवंती धिकार ३०, रिचाय धिकार २ वर्ष, संतोष शेलेकर, ६ वर्ष, पूनम बेलसरे १९, रामकली बेलसरे २८, शारदा तोटे २९, माणिकराव भास्कर २७, तुळशीराम भास्कर ४५, फुलकाय कास्देकर ४५, रिता मावस्कर २२, विलास बेलसरे १७, मनकू मावस्कर २२, बबिता मावस्कर २०, आेंकार बेलसरे ६५, शांता शेलूकर २५, प्रभू मावस्करगावकऱ्यांनी केला रस्ता रोकोशनिवारी सकाळी ११ वाजतापासून बागलिया येथे अतिसाराची लागण झाली असताना रविवारी दुपारपर्यंत रुग्णांच्या संख्येत सारखी वाढ होत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी रुग्णांना पुढील उपचारासाठी 'रेफर' करण्याची मागणी रेटून धरली व या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. प्रशासनाच्यावतीने तहसीलदार किशोर बागडे यांनी त्याची दखल घेत बागलिया येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.चार रुग्ण रेफरबागलिया येथे शंभरावर डायरियाचे रुग्ण असताना गंभीर चार रुग्णांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये बबीता मुन्ना मावस्कर (२०), शांता सुनील सेलुकर (२५), ओंकार मनसू बेलसरे (३५) आणि शिनू दहीकर (७०) या वृद्धेचा समावेश असून आदिवासी संघटनेचे महादेव कास्देकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल, सरपंच झिंगू धांडे, उपसरपंच मुंगीलाल कास्देकर आदी गावकऱ्यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरु होते.