शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या युगात वाढला ई-पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST

पान २ चे बॉटम सुमीत हरकुट चांदूर बाजार : ‘आमच्याकडे या तारखेला लग्न आहे. यायचे आहे बरे ...

पान २ चे बॉटम

सुमीत हरकुट

चांदूर बाजार : ‘आमच्याकडे या तारखेला लग्न आहे. यायचे आहे बरे का! पत्रिका एफबीवर तर शेअर केलीच आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला खास इन्व्हिटेशन कार्ड पाठवले आहे.’ असे ई-संदेश आता लोकांच्या अंगवळणी पडले आहेत. तंत्रज्ञानाची कास धरलेल्या युवा वर्गामध्ये आता पारंपरिक निमंत्रणाची कास सोडून ई-पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तुळशी विवाह होताच लग्नसराईची धूम आता सुरू झाली आहे. त्यात हा प्रकार सर्वाधिक दिसून येत आहे.

नोकरीच्या निमित्ताने अनेक युवक वेगवेगळ्या शहरांत राहतात. लग्नासाठीच अनेक युवक गावाच्या चकरा घालतात. पूर्वी नोकरीच्या शोधात बाहेर जाण्यासाठी सहसा कुणी तयार होत नव्हते. त्यामुळे मित्रपरिवारही आसपासच राहायचा. आज जग विस्तारल्याने अनेक मित्र एकमेकांपासून दुरावत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मात्र ते एकमेकांशी जोडलेले आहेत.

एखाद्याचे लग्न जुळताच आप्तमित्रांना पत्रिका पाठवायची कशी, हा प्रश्न पूर्वी भेडसावायचा. मग कसातरी मित्राचा पत्ता मिळवून त्यावर पत्रिका पाठवली जायची. ती मिळाली तर ठीक. नंतर ई-मेल चा उपयोग काही वर्षांपूर्वी केला जात होता. पुढे जाऊन फेसबूकवर लग्नपत्रिका मित्रांना शेअर व्हायला लागल्या. हल्ली काहीच वर्षांपूर्वी आलेल्या व्हॉट्सअप या मॅसेंजर अ‍ॅपवर पत्रिकेची इमेज लगेच पाठवणे शक्य झाले आहे. अशी ही पत्रिका पाठविल्यानंतर ‘मित्रा पत्रिका पाठवली आहे, यावेच लागेल’, असा संवाद

होतो.प्रिंटिंग व्यवसायास बाधक

ई-पत्रिकेच्या ट्रेंडमुळे पत्रिका छापून देण्याचा व्यवसाय कोरोनाकाळात तरी मंदावला आहे. लग्नसराईत त्यावर लाखो मिळविणारे व्यावसायिक आता नवे काही करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. आता लग्न, इतर मंगलकार्ये, तेरवी, वर्षश्रद्धाच्या पत्रिकासुद्धा ऑनलाईन तयार करून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवणे सुरू झाले आहे. क्षणात अर्थात वेळेत पत्रिका पोहचविण्याचे सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक वापर

कोरोनाकाळात विवाह प्रसंगातील बडेजावालाही मर्यादा आली. प्रथम २० व नंतर ५० वऱ्हाडींची मर्यादा घालून देण्यात आली. त्यामुळे ५० लोकांसाठी काय पत्रिका छापायचा, हा विचार पुढे आला. त्यावर उपाय म्हणून विविध अ‍ॅपच्या माध्यमातून घरच्या घरी लग्नपत्रिका बनविण्यात आल्या. त्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून आप्तमित्रांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले. लहान मुलांचे बर्थडेदेखील त्याला अपवाद नव्हते.