शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नंदनवनाच्या हिरवाईची पर्यटकांना ओढ

By admin | Updated: July 10, 2017 00:06 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महिन्याभरापासून पर्यटकांनी गर्दी केली असून पाऊस बेपत्ता असल्याने पर्यटक निराश मनाने परतत असल्याचे चित्र आहे.

निराशा : धबधबे आटले, गर्दी वाढली, आता पावसाची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महिन्याभरापासून पर्यटकांनी गर्दी केली असून पाऊस बेपत्ता असल्याने पर्यटक निराश मनाने परतत असल्याचे चित्र आहे. शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्याने पर्यटकांनी चिखलदऱ्यात गर्दी केली होती. मात्र, पावसाने हजेरी न लावल्याने निराश होऊन अनेक पर्यटक परतले. पावसाअभावी येथील प्रसिद्ध भीमकुंड, जगाडोह, देवी पॉर्इंट, पंचबोल पॉर्इंटवर हजारो फुट उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना मोहित करते. मात्र, अद्याप पाऊस बरसलेला नाही. आतापर्यंत पडलेल्या पावसाने बोडख्या टेकड्या तेवढ्या हिरव्या झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला. मात्र, खळखळ वाहणारे नदी-नाले कोरडे पडले आहेत. चिखलदऱ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दुसरा शनिवारृ आणि रविवारची सुटी पाहता पर्यटकांची संख्या गतवर्षीपेक्षा यावर्षी कमालीची वाढली आहे. नगरपालिकेच्या पर्यटन कर नाक्यावरून आकडेवारी स्पष्ट झाली.मध्यप्रदेश आणि विदर्भातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात चिखलदऱ्यात येतात. चिखलदरा नगरपालिकेच्या पर्यटक नोंदीवर नजर टाकली असता गतवर्षीपेक्षा येत्या जून आणि जुलै महिन्यात पर्यटकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. त्यानुसार जून २०१६ मध्ये ५,१४० प्रौढ पर्यटक आणि २०२ मुले अशा एकूण ५३४२ पर्यटकांनी हजेरी लावली होती. तर जुलै महिन्यात २३,८०० पर्यटकांची नोंद असून पालिकेला २ लक्ष ३७ हजार रुपयांचा पर्यटन महसूल मिळाला होता. यावर्षी २०१७ जूनमध्ये १७ हजार ७७४ प्रौढ तर २६४ मुल असे १८ हजार ३८ पर्यटकांनी हजेरी लावली. जुलै महिन्यात ९ तारखेपर्यंतच सात हजारांवर पर्यटकांचा आकडा गेला आहे. चिखलदरा नगर पालिकेला या सव्वा महिन्यातच २ लक्ष ३५ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. मात्र, आता पर्यटकांना पावसाची प्रतीक्षा आहे.पाऊस बेपत्ता, २११ मि.मी.चेरापुंजीची आठवण करून देत धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यात मनसोक्त भिजणारे पर्यटक असे काहीसे चित्र चिखलदरा पर्यटनस्थळावर दरवर्षी पाहायला मिळते. मात्र, यंदा पावसाने चांगलीच दडी मारल्याने पिण्याच्या पाण्यासाठी कधी नव्हे अशी वणवण शहरवासियांना करावी लागत आहे. रविवार ९ जुलैपर्यंत २११ मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी २०१६ मध्ये २९८ मि.मी.इतकी नोंद होती तर मागील ११ वर्षातील पावसाच्या नोंदीवर नजर टाकली असता सन २०१३ मध्ये सर्वाधिक २४७३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सन २००६ मध्ये सर्वात कमी ११७६ मि.मी. पाऊस चिखलदऱ्यात कोसळला आहे. गतवर्षी हत्तीडोहामध्ये मनसोक्त आंघोळीची मौज केली होती. मात्र, यावर्षी निराशा झाली. पावसाशिवाय चिखलदऱ्यात मजा नाही.- ध्ीारज ओझापर्यटक, बऱ्हाणपूरचिखलदऱ्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे येथील धबधबे आटले आहेत. पावसात पर्यटनाचे सौंदर्य खुलून येते. पर्यटकांवरच येथील व्यवसाय अवलंबून आहे.- राजेंद्रसिंह सोमवंशी, नगराध्यक्ष,