शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

वृक्षलागवड संपली, वृक्षकटाई सुरू

By admin | Updated: July 10, 2017 00:11 IST

राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला.

मुख्य उद्देशालाच हरताळ: रस्ता चौपदरीकरणात हिरव्या झाडांची कत्तललोकमत न्यूज नेटवर्कवरूड : राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या उपक्रमाला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. ‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ या ब्रिदानुसार तालुुक्यात दोन लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. पंरतु, वरूड ते पांढुर्णा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे विकासाच्या नावावर वृक्ष लागवड अभियानालाच हरताळ फासण्याचा प्रकार सुरूअसल्याचे चित्र आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने चौपदरीकरणाला सुरूवात झाली. वरूड ते पांढुर्णा राज्य महामार्ग असून यामहामार्गाच्या कडेला हजारो झाडे आहेत. मात्र, विकास व रस्ते रूंदीकरणाच्या नावावर हजारो हिरव्या झाडांचा बळी जाणार आहे. रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असल्याने निंब, बाभळीसह आडजातीच्या वृक्षांची देखील सर्रास कत्तल सुरु आहे. पर्यावरण संवर्धनाचे काय?शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व नेते मंडळी आपले फोटो प्रसिद्ध करून चांगलीच प्रसिद्धी मिळवितात. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष संगोपनाची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार होत नाही. हा पर्यावरण संवर्धनालाच हरताळ फासण्याचा प्रकार असल्याचे मत आता जाणकार व्यक्त करीत आहेत. एकीकडे वृक्षारोपण दुसरीकडे वृक्षकटाई असा दुटप्पी कार्यक्रम शासन राबवित असल्याचा आरोप केला जात आहे.