शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राज्यात आरएफओंच्या वृक्षतोड परवानगीला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 16:31 IST

गैरअनुसूचितील झाडांची कत्तल : गाव नमुना, सातबाराची अट गुंडाळली

अमरावती : जिल्हाधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे असलेले गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या वृक्षतोडीचे अधिकार आता वनक्षेत्राधिकारी (आरएफओ) यांना बहाल करण्यात आले आहे. मात्र, आरएफओंनी अधिकाराचा दुरूपयोग केल्यामुळे चांद्यापासून तर बांधापर्यंत गैरअनुसूचितील झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. गाव नमुना, सातबारा आदी कागदपत्रांची पडताळणी न करता आरएफ ओंकडून वृक्षतोडीची परवानगी देण्यात येत आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी यापूर्वी चार कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली. आता १ जुलैपासून १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वनमंत्री, वनसचिव पायाला भिंगरी बांधून वृक्षलागवडीची ही मोहीम फत्ते करण्यासाठी अवघे राज्य पालथे घालत आहेत. मात्र, ज्या वनक्षेत्राधिकाºयांकडे वनक्षेत्राची जबाबदारी सोपविली तेच अधिकारी आता गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या झाडांची कत्तल करण्याची परवानगी देत आहेत. एमएलआर कोड, १९६६ मधील कलम २१ ते २५(१) नुसार जमिनींवर उभ्या असलेल्या सर्व झाडांची नोंद ही गावनमुना ११ व सातबारा उताºयावर असणे बंधनकारक आहे. तथापि, मूळ कागदपत्रांची पडताळणी न करता गैरअनुसूचितील झाडांची कत्तल करण्याची परवानगी दिली जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे यापूर्वी जिल्हाधिकारी वा त्यांनी अधिकार प्रदान केलेले महसूल अधिकारी यांनी १९६६ ते २०१७ असे ५१ वर्षे गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी हे सर्व अधिकारी गंभीर स्वरूपाचे दोषी असल्याचे स्पष्ट होते. विकासकामे व रस्ते निर्मितीच्या नावे अनेक वर्षे जुनी वनराई नियमबाह्य नष्ट करण्यात आल्याप्रकरणी नागपूर येथील वन भवनातील एका वरिष्ठ वनाधिकाºयांबाबत गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, हा अहवाल हल्ली मुख्यमंत्री कार्यालयात गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. वनक्षेत्राधिकाऱ्यांना १ ऑगस्ट २०१७ पासून गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या वृक्षतोडीचे अधिकार प्रदान करण्यात आल्यामुळे नियमबाह्य वृक्षतोडीला उधाण आले आहे. गैरअनुसूचित निंब, बाभूळ, महारुख, सुबाभूळ, सरू, हिवर, वड, पिंपळ आदी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे.

आरागिरण्यांमध्ये लाकडांच्या प्रजातीनुसार नोंद नाहीराज्यात चार हजारांपेक्षा अधिक आरागिरण्या असल्याची वनविभागात नोंद आहे. मात्र, ‘अ, ब, क, ड’ या वर्गवारीनुसार अरागिरण्यांमध्ये येत असलेल्या लाकडांच्या प्रजातीनुसार नोंद केली जात नाही. त्यामुळे आरागिरण्यांमध्ये नियमबाह्य कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते. उपवनसंरक्षक, वनक्षेत्राधिकारी अथवा संबंधित वनपालांकडून आरागिरण्यांची आकस्मिक तपासणी करू न २७ मुद्द्यांची पडताळणी केली जात नाही, अशी माहिती आहे. 

टॅग्स :environmentवातावरणAmravatiअमरावती