शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आरएफओंच्या वृक्षतोड परवानगीला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 16:31 IST

गैरअनुसूचितील झाडांची कत्तल : गाव नमुना, सातबाराची अट गुंडाळली

अमरावती : जिल्हाधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे असलेले गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या वृक्षतोडीचे अधिकार आता वनक्षेत्राधिकारी (आरएफओ) यांना बहाल करण्यात आले आहे. मात्र, आरएफओंनी अधिकाराचा दुरूपयोग केल्यामुळे चांद्यापासून तर बांधापर्यंत गैरअनुसूचितील झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. गाव नमुना, सातबारा आदी कागदपत्रांची पडताळणी न करता आरएफ ओंकडून वृक्षतोडीची परवानगी देण्यात येत आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी यापूर्वी चार कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली. आता १ जुलैपासून १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वनमंत्री, वनसचिव पायाला भिंगरी बांधून वृक्षलागवडीची ही मोहीम फत्ते करण्यासाठी अवघे राज्य पालथे घालत आहेत. मात्र, ज्या वनक्षेत्राधिकाºयांकडे वनक्षेत्राची जबाबदारी सोपविली तेच अधिकारी आता गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या झाडांची कत्तल करण्याची परवानगी देत आहेत. एमएलआर कोड, १९६६ मधील कलम २१ ते २५(१) नुसार जमिनींवर उभ्या असलेल्या सर्व झाडांची नोंद ही गावनमुना ११ व सातबारा उताºयावर असणे बंधनकारक आहे. तथापि, मूळ कागदपत्रांची पडताळणी न करता गैरअनुसूचितील झाडांची कत्तल करण्याची परवानगी दिली जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे यापूर्वी जिल्हाधिकारी वा त्यांनी अधिकार प्रदान केलेले महसूल अधिकारी यांनी १९६६ ते २०१७ असे ५१ वर्षे गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी हे सर्व अधिकारी गंभीर स्वरूपाचे दोषी असल्याचे स्पष्ट होते. विकासकामे व रस्ते निर्मितीच्या नावे अनेक वर्षे जुनी वनराई नियमबाह्य नष्ट करण्यात आल्याप्रकरणी नागपूर येथील वन भवनातील एका वरिष्ठ वनाधिकाºयांबाबत गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, हा अहवाल हल्ली मुख्यमंत्री कार्यालयात गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. वनक्षेत्राधिकाऱ्यांना १ ऑगस्ट २०१७ पासून गैरअनुसूचितील सर्व प्रकारच्या वृक्षतोडीचे अधिकार प्रदान करण्यात आल्यामुळे नियमबाह्य वृक्षतोडीला उधाण आले आहे. गैरअनुसूचित निंब, बाभूळ, महारुख, सुबाभूळ, सरू, हिवर, वड, पिंपळ आदी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे.

आरागिरण्यांमध्ये लाकडांच्या प्रजातीनुसार नोंद नाहीराज्यात चार हजारांपेक्षा अधिक आरागिरण्या असल्याची वनविभागात नोंद आहे. मात्र, ‘अ, ब, क, ड’ या वर्गवारीनुसार अरागिरण्यांमध्ये येत असलेल्या लाकडांच्या प्रजातीनुसार नोंद केली जात नाही. त्यामुळे आरागिरण्यांमध्ये नियमबाह्य कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते. उपवनसंरक्षक, वनक्षेत्राधिकारी अथवा संबंधित वनपालांकडून आरागिरण्यांची आकस्मिक तपासणी करू न २७ मुद्द्यांची पडताळणी केली जात नाही, अशी माहिती आहे. 

टॅग्स :environmentवातावरणAmravatiअमरावती