शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उपाशी पोट अन् अनवाणी पायाने केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला.

ठळक मुद्देआदिवासींची वाताहत : शेकडो किलोमीटरची पायपीट; अधिकाऱ्यांची समयसूचकता

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दुपारी दीड वाजताची वेळ. अंगाची लाहीलाही करणारे उन्ह. तीन चिमुकल्यांच्या हातात चार केळी, दोन रुपयांचा बिस्किट पुडा. ११ जणांसाठी पाण्याची एकमेव बॉटल. सर्वांच्या डोक्यावर भांड्याकुंड्याचे ओझे. शंभर किलोमीटरचा प्रवास करीत उपाशीपोटी गावाकडे निघालेल्या या आदिवासींना पाहून अधिकाऱ्यांची गाडी थांबली. विचारणा झाली. नजीकच्या झाडाखाली सावलीत बसवून त्यांना पाणी पुरविले गेले. डॉक्टरांना पाचारण करून तपासणीदेखील झाली. पोटभर जेवणाची व्यवस्था केल्यावर त्यांना शासकीय वाहनाने गावापर्यंत पोहचविले गेले. मेळघाटातील सोनापूर-एकझिरा रस्त्यावर शनिवारी हे दिलासादायक चित्र अधिकाऱ्यांच्या समयसूचकतेने निदर्शनास आले.पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला. मेळघाटातूनही हजारो आदिवासी कामाच्या शोधात परराज्यासह राज्यातील बड्या शहरांमध्ये कामासाठी गेले होते. परंतु, दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी अडकल्याने गावाकडे जाण्याची ओढ लागली. जवळचे कमावलेले धन होते, ते सर्व संपले. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करीत आदिवासी चिल्यापाल्यांसह गाव जवळ करीत आहेत. दर्यापूर येथे कामाला आलेले ११ आदिवासी तीन चिमुकल्यांसह धारणी तालुक्यातील कसाईखेडा येथे जाण्यासाठी पायी निघाले होते. त्या रस्त्याने चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व कर्मचारी पाणीटंचाई व टँकरचा आढावा घेण्यासाठी जात असताना हा समूह त्यांच्या दृष्टीस पडला.आरोग्य तपासणीधारणी तालुक्यातील कसाईखेडा येथील ते आदिवासी दर्यापूर येथे दाल मिलमध्ये कामासाठी गेले होते आणि तिथून ते पायी गावाकडे निघाले होते. त्या आदिवासींसाठी नजीकच्या टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वाहन बोलवून त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना भोजन देण्यात आले. धारणीचे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याशी संवाद साधून कसाईखेडा येथे जाण्याची व्यवस्था करण्यात आली.शनिवारी पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी जात असताना काही आदिवासी पायी जाताना दिसले. त्यांची विचारपूस करून आरोग्य तपासणी व जेवण देऊन त्यांना शासकीय वाहनाने गावी पाठविण्यात आले.- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या