शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

उपाशी पोट अन् अनवाणी पायाने केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला.

ठळक मुद्देआदिवासींची वाताहत : शेकडो किलोमीटरची पायपीट; अधिकाऱ्यांची समयसूचकता

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दुपारी दीड वाजताची वेळ. अंगाची लाहीलाही करणारे उन्ह. तीन चिमुकल्यांच्या हातात चार केळी, दोन रुपयांचा बिस्किट पुडा. ११ जणांसाठी पाण्याची एकमेव बॉटल. सर्वांच्या डोक्यावर भांड्याकुंड्याचे ओझे. शंभर किलोमीटरचा प्रवास करीत उपाशीपोटी गावाकडे निघालेल्या या आदिवासींना पाहून अधिकाऱ्यांची गाडी थांबली. विचारणा झाली. नजीकच्या झाडाखाली सावलीत बसवून त्यांना पाणी पुरविले गेले. डॉक्टरांना पाचारण करून तपासणीदेखील झाली. पोटभर जेवणाची व्यवस्था केल्यावर त्यांना शासकीय वाहनाने गावापर्यंत पोहचविले गेले. मेळघाटातील सोनापूर-एकझिरा रस्त्यावर शनिवारी हे दिलासादायक चित्र अधिकाऱ्यांच्या समयसूचकतेने निदर्शनास आले.पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला. मेळघाटातूनही हजारो आदिवासी कामाच्या शोधात परराज्यासह राज्यातील बड्या शहरांमध्ये कामासाठी गेले होते. परंतु, दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी अडकल्याने गावाकडे जाण्याची ओढ लागली. जवळचे कमावलेले धन होते, ते सर्व संपले. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करीत आदिवासी चिल्यापाल्यांसह गाव जवळ करीत आहेत. दर्यापूर येथे कामाला आलेले ११ आदिवासी तीन चिमुकल्यांसह धारणी तालुक्यातील कसाईखेडा येथे जाण्यासाठी पायी निघाले होते. त्या रस्त्याने चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व कर्मचारी पाणीटंचाई व टँकरचा आढावा घेण्यासाठी जात असताना हा समूह त्यांच्या दृष्टीस पडला.आरोग्य तपासणीधारणी तालुक्यातील कसाईखेडा येथील ते आदिवासी दर्यापूर येथे दाल मिलमध्ये कामासाठी गेले होते आणि तिथून ते पायी गावाकडे निघाले होते. त्या आदिवासींसाठी नजीकच्या टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वाहन बोलवून त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना भोजन देण्यात आले. धारणीचे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याशी संवाद साधून कसाईखेडा येथे जाण्याची व्यवस्था करण्यात आली.शनिवारी पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी जात असताना काही आदिवासी पायी जाताना दिसले. त्यांची विचारपूस करून आरोग्य तपासणी व जेवण देऊन त्यांना शासकीय वाहनाने गावी पाठविण्यात आले.- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या