शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

धारणीत खासगी बसेसच्या टपावर बसून प्रवास

By admin | Updated: January 26, 2017 00:41 IST

तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीला प्रचंड प्रमाणात उत आला आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : रस्ता सुरक्षा अभियानाची लागली वाट, अपघात घडल्यास जबाबदार कोण? धारणी : तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीला प्रचंड प्रमाणात उत आला आहे. हासर्व प्रकार पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याने नाईलाजास्तव प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. मेळघाटातील आदिवासींची जीवनसंगिनी म्हणून विख्यात असलेली अकोला-महू या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण होत असल्याने एक डिसेंबपरपासून ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. याचाच फायदा अकोला व अकोट येथील खासगी बसधारकांनी उचलला आहे. या बसधारकांनी कोणताही परवाना नसताना ७ ते ८ गाड्या धारणी ते अकोट मार्गे सुरू केल्या आहेत. अवैधरित्या सुरू असलेल्या या बसेसवर धारणी-अकोट-धारणी असे बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, या बसेसवर परवाना कालावधी, वेळापत्रक, दरफलक व विमा मुदतीचे उल्लेख टाळण्यात आले आहेत. अवैधरित्या धावणाऱ्या बसेसबद्दल तक्रार झाल्यावर थातूरमातूर तपासणी करून चौकशीचा देखावा वाहतूक पोलिसांनी केला. मात्र, नंतर सगळ्यांना अभयदान देण्यात आले आहे. या बसेसवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबूून नेले जात आहेत. बसच्या छतावर बसवून सुद्धा जीवघेणा प्रवास सतत सुरू आहे. या बसेसला अपघात होऊन प्राणहानी झाल्यास कोण जबाबदार राहणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधितांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)घाटातून सर्रास धोकादायक वाहतूकअकोट ते धारणीचे अंतर ९६ किलोमीटर आहे. यापैकी जवळपास २५किलोमीटरचे अंतर अंत्यत लहान मार्गावरील घाटवळणावरून चालतात. क्षमतेपेक्षा जास्त व लवकर पोहोचण्याच्या व प्रवासी मिळविण्यासाठी या बसेसध्ये अक्षरश: शर्यत लागते. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.