शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांपासून ‘ट्रामा केअर’ अडगळीत

By admin | Updated: October 3, 2015 00:11 IST

बडनेऱ्यातील ट्रामा केअर हॉस्पिटल तब्बल अडीच वर्षांपासून इमारतीसह सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असताना देखील...

शासन-प्रशासन उदासीन : पालकमंत्री घेणार का दखल? लोकमत विशेषश्यामकांत सहस्त्रभोजने  बडनेराबडनेऱ्यातील ट्रामा केअर हॉस्पिटल तब्बल अडीच वर्षांपासून इमारतीसह सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असताना देखील शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणापायी सुरु होऊ शकलेले नाही. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खुद्द या अत्यावश्यक सेवेला रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेऊन सुरू करावे, असे बोलल्या जात आहे. २०११ सालात ट्रामा केअर हॉस्पिटलच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. अवघ्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत उभी करुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत ट्रामा केअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत सुरू करण्यासाठी बडनेरा शहरवासीय तसेच परिसरवासीयांना आश्वासनाची खैरात वाटण्यात आली. त्यात याचा समावेश होता. इमारत उभी होऊन तब्बल अडिच वर्षाचा तर विधानसभा निवडणुकांना एक वर्षाचा कालावधी लोटूनदेखील बडनेऱ्याचे ट्रामा केअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत रुजू झालेले नाही. लाखो रुपये शासनाने या ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी खर्च केले आहे. सध्या दोन डॉक्टर देखील या ठिकाणी देण्यात आले आहे. ते मोदी दवाखान्याचे रुग्ण तपासीत आहे. तीन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहे. विद्युत पुरवठा तसेच इतर देखभालीवर शासनाचे लाखों रुपये वायफळ खर्च होत आहे. ट्राम केअर हॉस्पिटलमध्ये सर्वसोयीसुविधा उपलब्ध आहे. केवळ कर्मचाऱ्यांची कमी असल्याचा कांगावा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील संबंधित अधिकारी करीत आहे. ट्रामा केअर हॉस्पीटलचा मुद्दा अडगळीत का पडला आहे हा प्रश्न बडनेरा शहरासह परिसरवासीयांमध्ये आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी याकडे लक्ष पुरवावे व ट्रामा केअर हॉस्पिटलला रुग्णांच्या सेवेत सुरू करावे, असे बडनेरावासीयांमध्ये बोलल्या जात आहे. वर्षभरात अपघाताचे हजारो रुग्णयवतमाळ व अकोला महामार्गावर अपघातांचे मोठे प्रमाण आहे. अमरावतीत ५० किलोमीटर लांब अंतरावरील अपघातांचे रुग्ण उपचारासाठी रुग्णवाहिकेने येत असतात. दरम्यान अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे दगावत असल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहे. बडनेऱ्यातील ट्रामा केअर हॉस्पिटल सुरू झाल्यास वेळेत उपचर मिळून अनेकांचे जीव वाचतील, असे कळकळीने परिसरवासीय बोलीत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून पालकमंत्र्यांनीच याची दखल घ्यावी, असेही बोलल्या जात आहे.