शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राजस्थानातील ‘त्या’ मजुरांची कंटेनरमधून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ठळक मुद्देआरोग्य तपासणी : शिरखेड पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : राजस्थानातू महाराष्ट्रात लाकडी फर्निचरचे काम करण्याकरिता आलेल्या ८० कारागिरांना राजस्थानला परत घेऊन जाणारा एक मोठा ट्रक मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार, २७ मार्चला सायंकाळी पकडण्यात आला. सदर वाहनातील सर्व लोकांना कोरोना तपासणीकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीअंती पुढील निर्णय घेऊन शिरखेडमधून आणले गेले. या ८० मजुरांमध्ये ५ महिला ४ लहान मुलांचीही तपासणी करून शासकीय वसतिगृहात पाठविले. वसतिगृहात राहण्याची सोय तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशानुसार केली आहे.या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीदेखील सदर मजूर आपल्या गावी जाण्याचा हट्ट सोडत नसल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार राजस्थान वरून मोठ्या प्रमाणात लाकडी कोरीव काम करणारे हे कारागीर महाराष्ट्रात सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वत्र 'लॉकडाऊन' केल्यामुळे सदर कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ८० कामगार राजस्थानकडे परत जात असताना शिरखेड पोलिसांना आढळून आले. त्यांनी ट्रक क्रमांक आरजे १९ जीएफ ४५०२ हा टाटा कंपनीचा ४०१८ मॉडेलचा ट्रक अडवून त्यांची चौकशी केली असता, ट्रकचा चालक-मालक पताराम केसाराम चौधरी (रा. शेरगड जि. जोधपूर राजस्थान) याने दिलेल्या माहितीवरून, ओरिसा ते महाराष्ट्र दरम्यान विखुरलेल्या समस्त कारागिरांना तो आपल्या गावी राजस्थानात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. सदर वाहन ओडिशावरून राजस्थानातील सर्व मजुरांना घेऊन नागपूर येथे पोहचला. तेथून अमरावती येथील ४० ते ४५ लोकांना घेऊन राजस्थानच्या दिशेने रवाना झाला होता. परंतु शिरखेड पोलिसांनी तो अडवून 'डिटेन' केला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.