शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातील ‘त्या’ मजुरांची कंटेनरमधून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ठळक मुद्देआरोग्य तपासणी : शिरखेड पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : राजस्थानातू महाराष्ट्रात लाकडी फर्निचरचे काम करण्याकरिता आलेल्या ८० कारागिरांना राजस्थानला परत घेऊन जाणारा एक मोठा ट्रक मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार, २७ मार्चला सायंकाळी पकडण्यात आला. सदर वाहनातील सर्व लोकांना कोरोना तपासणीकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीअंती पुढील निर्णय घेऊन शिरखेडमधून आणले गेले. या ८० मजुरांमध्ये ५ महिला ४ लहान मुलांचीही तपासणी करून शासकीय वसतिगृहात पाठविले. वसतिगृहात राहण्याची सोय तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशानुसार केली आहे.या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीदेखील सदर मजूर आपल्या गावी जाण्याचा हट्ट सोडत नसल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार राजस्थान वरून मोठ्या प्रमाणात लाकडी कोरीव काम करणारे हे कारागीर महाराष्ट्रात सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वत्र 'लॉकडाऊन' केल्यामुळे सदर कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ८० कामगार राजस्थानकडे परत जात असताना शिरखेड पोलिसांना आढळून आले. त्यांनी ट्रक क्रमांक आरजे १९ जीएफ ४५०२ हा टाटा कंपनीचा ४०१८ मॉडेलचा ट्रक अडवून त्यांची चौकशी केली असता, ट्रकचा चालक-मालक पताराम केसाराम चौधरी (रा. शेरगड जि. जोधपूर राजस्थान) याने दिलेल्या माहितीवरून, ओरिसा ते महाराष्ट्र दरम्यान विखुरलेल्या समस्त कारागिरांना तो आपल्या गावी राजस्थानात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. सदर वाहन ओडिशावरून राजस्थानातील सर्व मजुरांना घेऊन नागपूर येथे पोहचला. तेथून अमरावती येथील ४० ते ४५ लोकांना घेऊन राजस्थानच्या दिशेने रवाना झाला होता. परंतु शिरखेड पोलिसांनी तो अडवून 'डिटेन' केला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.