शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

वनपालांना बदल्यांचे वेध, परतवाड्याकरिता २७ वनपाल स्पर्धेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:08 IST

परतवाडा आरएफओ आणि वनपाल हे दोघेही बदलीस पात्र आहेत

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : वनविभागातील वनपालांना सध्या बदल्यांचे वेध लागले आहेत. परतवाडा वनपालपदाकरिता २७ वनपाल स्पर्धेत आहेत. ते आपआपल्या स्तरावर प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत.परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक्षेत्र अधिका-यांचे (आरएफओ) व परतवाडा वनपालाचे पद ‘अर्थपूर्ण’ व्यवहारात महत्त्वाचे मानले जाते. अमरावती आरागिरणी वनपालपदाखालोखाल परतवाडा, शेकदरी आणि वरूड वनपालपदाला अमरावती प्रादेशिक वनविभागात चांगलीच मागणी आहे.परतवाडा आरएफओ आणि वनपाल हे दोघेही बदलीस पात्र आहेत. त्यांनी आपला निर्धारित कार्यकाळ पूर्ण केला आहे. बदलीस पात्र असल्यामुळे ते या ठिकाणी राहण्यास इच्छुकनाहीत, तर परतवाडा वनपालाने बदलीकरिता स्वत:हून अर्ज दिला आहे. याची भनक स्पर्धकांना लागल्यामुळे मागील चार महिन्यांपासूनच ते स्पर्धेत उतरले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्पर्धक थोडे थंडावले होते. पण, आचारसंहिता संपताच स्पर्धकांनी परत डोके वर काढले आहे.वनमजूर ते वनपाल पदापर्यंत पोहोचत सर्वाधिक सेवाकाळ परतवाड्यातच घालवणाºया एका वनपालाने या स्पर्धेत चांगलीच रंगत आणली आहे. स्पर्धेतील स्पर्धकांच्या नाकीनऊ  आणत परतवाडा वनपालपदी आपणच राहणार असल्याचा दावा ‘त्या’ वनपालाने केला आहे. यात मुख्य वनसंरक्षक (अमरावती प्रादेशिक) यांच्या बंगल्यावर सेवेतील एका वनकर्मचाºयाची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.अशीही दहशतवनमजूर ते वनपालपदापर्यंत पोहोचत आपला सार्वाधिक सेवाकाळ परतवाड्यात घालवणाºया आणि परतवाडा वनपालपदावर प्रबळ दावा करणा-या या वनपालाची चांगलीच दहशत आहे. स्वत:चे हितसंबंध जोपासले गेले, तर चूप आणि जपले गेले नाही, तर आरएफओपासून सर्वांना उघड करण्याची वृत्ती या वनपालाच्या अंगी विकसित आहे.दरम्यान, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) हे वनमजूर ते वनपाल असा प्रवासपूर्ण करीत सर्वाधिक काळ परतवाड्यात घालवणाºया वनपालाला परत एकदा पाठीशी घालतात की प्रामाणिकपणे बदली मागणा-या बदलीपात्र अर्जदाराला जवळ करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुख्य वनसंरक्षक कार्यालयाची मेहरनजरदहशत पसरविणा-या सदर वनपालावर मुख्य वनसंरक्षक कार्यालय चांगलेच मेहरबान आहे. संबंधित वनपाल यापूर्वी चिखलदरा येथे कार्यरत होते. व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्रचनेत एकछत्री नियंत्रणांतर्गत चिखलदरा येथील ते पद संपुष्टात आले. तेव्हा त्या वनपालाला धारणी भागात चित्री नर्सरीकडे वर्ग केले गेले. केवळ चार-सहा दिवस तेथे थांबून परत मुख्य वनसंरक्षक कार्यालय (अमरावती मोबाइल) मध्ये त्याला जागा दिली. याकरिता चिखलदरा येथील पद अमरावतीत वर्ग करून घेतले. अमरावती मोबाइलमध्ये असूनही परतवाड्यात थांबून मोबाइल आरएफओसह डीएफओचे अधिकार वापरीत आपली दहशत निर्माण करून अनेक ‘अर्थपूर्ण’ व्यवहार या वनपालाने अल्पावधीतच सिद्धीस नेले आहेत. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाºयासह त्यांच्या अधिनस्थ कर्मचाºयांच्या कार्यक्षेत्रातही या वनपालाने आपला हस्तक्षेप वाढविला आहे.प्रादेशिकमध्येच स्पर्धावनविभागांतर्गत बदली प्रक्रियेत प्रादेशिक वनविभागातील परतवाडा, शेकदरी, वरूड, अमरावती, आकोटमध्येच स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागासह संशोधन विभागात बदली करून घेण्याकरिता कुणीही इच्छुकनाही आणि यात कुठेही स्पर्धा नाही. शासकीय ‘मर्जी’चे धोरण शासकीय धोरणानुसार एकाच ठिकाणी किमान तीन वर्षे सेवा देणा-या कर्मचा-याची विभागाबाहेर बदली करण्यात येते. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून वनपालांच्या बदल्या करताना मर्जीतील कर्मचा-यांना त्यांच्या मागणीनुसार विनंती बदली देण्याच्या घटना ताज्या आहेत. विशिष्ट कर्मचा-याला वर्षभरातच बदली देऊन इतर बदलीपात्र वनपालांवर अन्याय करण्याचा प्रकारही जुना नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती