शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

धडपड वृक्षांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:08 IST

पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत.

ठळक मुद्देभानखेडा मार्गावर रोपांना पाणी। निसर्ग समृद्ध करण्यासाठी धडपडताहेत आबालवृद्ध

धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत. या उपक्रमाला पहाटे रपेट करणाऱ्या सुमारे अडीचशे जणांनी वाहून घेतले आहे.निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या या पर्यावरणप्रेमी गटाने आपली ओळख निर्माण करणारी संस्था वा गट स्थापन केलेला नाही. चार-पाच जणांनी सुरू केलेल्या या उपक्रमात आतापर्यंत अडीचशेवर नागरिक जुळले आहेत. त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी साडेचारपासून. भानखेडा मार्गाने येताना लागणाऱ्या नवीन बायपासपुढे ते वाहने सोडतात. त्यानंतर दोन किमी अंतरावरील सप्तऋषी कष्टभंजन हनुमान मंदिरानजीक हापशीजवळ येतात. येथेच हजरत सैयद इमाम कादरी यांचा दर्गा व टेकडीवर एक मंदिर आहे. या हापशीवर व त्यापुढील टाक्यातून तेलाच्या पाच लिटरच्या निकामी कॅन पाण्याने भरल्या जातात. वनविभागाच्या रोपवाटिकेपासून तर थेट घाट संपेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रोपे व पक्ष्यांची घरटी लावली आहेत. त्यामध्ये कॅनमधील पाणी रिचवले जाते. विशेष म्हणजे, या रस्त्याने फिरायला जाणारे मध्यमवयीन ते अगदी नवतरुण अमरावतीकर स्वयंस्फूर्तीने कॅन उचलून रोपांना पाणी देतात आणि कॅन परत आणतात. याशिवाय टेकडीपर्यंत लावलेल्या झाडांनाही पाणी दिले जाते. काही ठिकाणी प्लास्टिक बॉटल उलट्या लटकविल्या गेल्या आहेत. त्यातही पाणी टाकले जाते. सकाळी ८ ते ८.३० पर्यंत हा उपक्रम नित्यनेमाने राबविला जात आहे.तीन महिन्यांपूर्वी चंचल गुल्हाने, पेरू कोल्हे, लक्ष्मण खाडे यांच्यासह काही सेवानिवृत्तांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला युवा वर्गाने भरघोस प्रतिसाद दिला. काही जण घरूनच बॉटल भरून आणतात. सामूहिक योगदानातून हा संपूर्ण परिसर हिरवागार करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला आहे.पक्ष्यांची सोय केवळ झाडे मोठी करणेच उद्दिष्ट नाही, तर या राखीव नवक्षेत्रातील पक्षिविश्व कायम राखण्यासाठी झाडांना मातीचे पसरट भांडे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये सकाळी रपेट करणारे आवर्जून पाणी टाकतात. काही सुहृद पक्ष्यांना भरवण्यासाठी खाद्यदेखील आणतात.यांचा सहभाग माधव कुलकर्णी, विजय देवळे, अशोक उभाड, दिगंबर पोफळी, मनोज बांबल, प्रसाद बडगे, रवींद्र बनसोड, नीळकंठराव गजभिये, नरेंद्र रामटेके, श्रीकृष्ण बोंद्रे, सचिन पिकलमुंडे, परीक्षित ढेकेकर, दिलीप खटे, गजानन धर्माळे, दिनेश बाजड, नामदेव मेटांगे, प्रवीण पंचाक्षरी, मनीष काळे, उदय जलतारे, सूरज शेळके, निनाद शर्मा आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Waterपाणी