शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

धडपड वृक्षांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:08 IST

पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत.

ठळक मुद्देभानखेडा मार्गावर रोपांना पाणी। निसर्ग समृद्ध करण्यासाठी धडपडताहेत आबालवृद्ध

धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत. या उपक्रमाला पहाटे रपेट करणाऱ्या सुमारे अडीचशे जणांनी वाहून घेतले आहे.निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या या पर्यावरणप्रेमी गटाने आपली ओळख निर्माण करणारी संस्था वा गट स्थापन केलेला नाही. चार-पाच जणांनी सुरू केलेल्या या उपक्रमात आतापर्यंत अडीचशेवर नागरिक जुळले आहेत. त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी साडेचारपासून. भानखेडा मार्गाने येताना लागणाऱ्या नवीन बायपासपुढे ते वाहने सोडतात. त्यानंतर दोन किमी अंतरावरील सप्तऋषी कष्टभंजन हनुमान मंदिरानजीक हापशीजवळ येतात. येथेच हजरत सैयद इमाम कादरी यांचा दर्गा व टेकडीवर एक मंदिर आहे. या हापशीवर व त्यापुढील टाक्यातून तेलाच्या पाच लिटरच्या निकामी कॅन पाण्याने भरल्या जातात. वनविभागाच्या रोपवाटिकेपासून तर थेट घाट संपेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रोपे व पक्ष्यांची घरटी लावली आहेत. त्यामध्ये कॅनमधील पाणी रिचवले जाते. विशेष म्हणजे, या रस्त्याने फिरायला जाणारे मध्यमवयीन ते अगदी नवतरुण अमरावतीकर स्वयंस्फूर्तीने कॅन उचलून रोपांना पाणी देतात आणि कॅन परत आणतात. याशिवाय टेकडीपर्यंत लावलेल्या झाडांनाही पाणी दिले जाते. काही ठिकाणी प्लास्टिक बॉटल उलट्या लटकविल्या गेल्या आहेत. त्यातही पाणी टाकले जाते. सकाळी ८ ते ८.३० पर्यंत हा उपक्रम नित्यनेमाने राबविला जात आहे.तीन महिन्यांपूर्वी चंचल गुल्हाने, पेरू कोल्हे, लक्ष्मण खाडे यांच्यासह काही सेवानिवृत्तांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला युवा वर्गाने भरघोस प्रतिसाद दिला. काही जण घरूनच बॉटल भरून आणतात. सामूहिक योगदानातून हा संपूर्ण परिसर हिरवागार करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला आहे.पक्ष्यांची सोय केवळ झाडे मोठी करणेच उद्दिष्ट नाही, तर या राखीव नवक्षेत्रातील पक्षिविश्व कायम राखण्यासाठी झाडांना मातीचे पसरट भांडे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये सकाळी रपेट करणारे आवर्जून पाणी टाकतात. काही सुहृद पक्ष्यांना भरवण्यासाठी खाद्यदेखील आणतात.यांचा सहभाग माधव कुलकर्णी, विजय देवळे, अशोक उभाड, दिगंबर पोफळी, मनोज बांबल, प्रसाद बडगे, रवींद्र बनसोड, नीळकंठराव गजभिये, नरेंद्र रामटेके, श्रीकृष्ण बोंद्रे, सचिन पिकलमुंडे, परीक्षित ढेकेकर, दिलीप खटे, गजानन धर्माळे, दिनेश बाजड, नामदेव मेटांगे, प्रवीण पंचाक्षरी, मनीष काळे, उदय जलतारे, सूरज शेळके, निनाद शर्मा आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Waterपाणी