शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे आयएएस, आयपीएसचे प्रशिक्षण

By admin | Updated: August 10, 2015 00:00 IST

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, ...

पालकमंत्र्यांची घोषणा : जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहातअमरावती : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, यासाठी आता शासनाकडून त्यांना तीन महिन्यांचे नव्हे तर तीन वर्षांचे आयएएस, आयपीएस, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम व खनिकर्म उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केली.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात रविवारी अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. खासदार आंनदराव अडसूळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राजू तोडसाम, माजी महापौर वंदना कंगाले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त अशोक आत्राम, सहायक आयुक्त लेखापरीक्षक किशोर गुल्हाने, विठ्ठल मरापे, संजय मडावी, रामेश्वर युवानाते, हेमराज राऊत, सुरेश पटेल, दादाराव सलामे, रमेश धुर्वे, महादेव राघोर्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत शासनाने आदिवासी समाजासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतलेत. या निर्णयाची अंमलबजावणी आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत. हा समाज संस्कृती, रुढी, परंपरा जोपासणारा आहे. त्यांच्या संस्कृती संवर्धनासाठीसुध्दा सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिका आणि शिकवा हा मूलमंत्र ध्यानी ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. आदिवासी विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेव्दारे उच्च पदावर आरुढ व्हावा, यासाठी शासनाच्यावतीने प्रशिक्षण योजना आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा करण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री पोटे यांनी दिली.या कार्यक्रमानिमित्त अमरावती, लातूर व औरंगाबाद या विभागातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, धनादेश देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती खेडाळू अनिल तोडकर यांनाही गौरविण्यात आले. मेळघाटातील अपघातग्रस्त कुटुंबातील मातृछत्र हरविलेल्या तीन मुलांचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल ज्योती तोटेवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यशवंत मानव विकास संस्थेव्दारे निर्मित ‘मी बिरसा मुंडा बोलतोय’ ही एकांकिका सादर करण्यात आली. संचालन गाढवे व ज्योती तोडकर यांनी केले.बहुतांश लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठआदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला निमंत्रितांची लांबलचक नावे असलेली कार्यक्रम पत्रिका छापण्यात आली. मात्र पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ व आ. राजू तोडसाम वगळता एकाही लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमात हजेरी लावली नाही. यात गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हा परिषदचे अध्यक्ष सतीश उईके, माजी मंत्री मधुकर पिचड, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, खासदार रामदास तडस यांच्यासह श्रीकांत देशपांडे, सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रवी राणा, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले,अशोक उईके, संतोष टारफे यांचा समावेश आहे.