शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

आदिवासी विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे आयएएस, आयपीएसचे प्रशिक्षण

By admin | Updated: August 10, 2015 00:00 IST

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, ...

पालकमंत्र्यांची घोषणा : जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहातअमरावती : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, यासाठी आता शासनाकडून त्यांना तीन महिन्यांचे नव्हे तर तीन वर्षांचे आयएएस, आयपीएस, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम व खनिकर्म उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केली.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात रविवारी अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. खासदार आंनदराव अडसूळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राजू तोडसाम, माजी महापौर वंदना कंगाले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त अशोक आत्राम, सहायक आयुक्त लेखापरीक्षक किशोर गुल्हाने, विठ्ठल मरापे, संजय मडावी, रामेश्वर युवानाते, हेमराज राऊत, सुरेश पटेल, दादाराव सलामे, रमेश धुर्वे, महादेव राघोर्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत शासनाने आदिवासी समाजासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतलेत. या निर्णयाची अंमलबजावणी आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत. हा समाज संस्कृती, रुढी, परंपरा जोपासणारा आहे. त्यांच्या संस्कृती संवर्धनासाठीसुध्दा सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिका आणि शिकवा हा मूलमंत्र ध्यानी ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. आदिवासी विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेव्दारे उच्च पदावर आरुढ व्हावा, यासाठी शासनाच्यावतीने प्रशिक्षण योजना आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा करण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री पोटे यांनी दिली.या कार्यक्रमानिमित्त अमरावती, लातूर व औरंगाबाद या विभागातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, धनादेश देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती खेडाळू अनिल तोडकर यांनाही गौरविण्यात आले. मेळघाटातील अपघातग्रस्त कुटुंबातील मातृछत्र हरविलेल्या तीन मुलांचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल ज्योती तोटेवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यशवंत मानव विकास संस्थेव्दारे निर्मित ‘मी बिरसा मुंडा बोलतोय’ ही एकांकिका सादर करण्यात आली. संचालन गाढवे व ज्योती तोडकर यांनी केले.बहुतांश लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठआदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला निमंत्रितांची लांबलचक नावे असलेली कार्यक्रम पत्रिका छापण्यात आली. मात्र पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ व आ. राजू तोडसाम वगळता एकाही लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमात हजेरी लावली नाही. यात गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हा परिषदचे अध्यक्ष सतीश उईके, माजी मंत्री मधुकर पिचड, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, खासदार रामदास तडस यांच्यासह श्रीकांत देशपांडे, सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रवी राणा, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले,अशोक उईके, संतोष टारफे यांचा समावेश आहे.