शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रस्ता वाहतूक सुरक्षेचे मुलांना शिक्षण द्या

By admin | Updated: January 12, 2016 00:10 IST

रस्ता सुरक्षा ही पोलीस, समाज, पालक व पाल्यांची जबाबदारी आहे. वाहन वेगाने व घाईत चालविल्यामुळे बहुतांश अपघात होतात.

पालकमंत्री पोटे : रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियानाचे उद्घाटनअमरावती : रस्ता सुरक्षा ही पोलीस, समाज, पालक व पाल्यांची जबाबदारी आहे. वाहन वेगाने व घाईत चालविल्यामुळे बहुतांश अपघात होतात. वेग नियंत्रणात ठेऊन वाहन चालविल्यास अपघात कमी होतील. अपघात कमी करण्यासाठी तसेच समाजात जागरुकता आणण्यासाठी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यावे आणि रस्ता सुरक्षेचे प्रात्यक्षिक वर्षभर सुरु ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केल्या.येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित २७ व्या रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियानचे उदघाटन ना. पोटे यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवास्कर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे उपस्थित होते. वाहन परवाने देताना कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी व्हावी, तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करावी, कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्वांनी कामे करावीत, असेही ना. पोटे म्हणाले. यावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात दिनदर्शिका, पुस्तिका, पॉम्पलेटचे विमोचन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. बोंडे म्हणाले, उमेदवारांची बौध्दिक व मानसिक स्थिती पाहावी. शालेय विद्यार्थ्यांना जबाबदारी देऊन वर्षभर मोहीम राबवावी. मागील वर्षी ४ लाख ९० हजार लोक अपघातात जखमी झालेत. त्यापैकी एक लाख २४ हजार लोकांचा मृत्यू झाला. या अपघातातील ५२ टक्के लोक १८ ते २९ वर्षे वयोगटातील होते. एकू ण अपघातात १६ टक्के दोष वाहन चालकांचा आहे. नवीन वाहने खरेदी करण्यापूर्वी ती चालविण्यासंदर्भात संपूर्ण माहिती व तंत्रज्ञान वाहन चालकांना द्यावे, डिलर व विक्रेत्यांचीही रस्ते सुरक्षा सप्ताहात मदत घ्यावी, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी गित्ते यांनी दिली. मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलकांव्दारे रस्ते वाहतूक नियमांची माहिती द्यावी, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी बेदरकारपणे वाहने चालवतात त्यांना समुपदेशन करावे, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती तोटेवार व आभार प्रदर्शन मार्तंड नेवासकर यांनी केले.