शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वाहतूक पोलीस वसुलीत मग्न!

By admin | Updated: April 25, 2016 00:03 IST

शहरातील अपघाताची जीवघेणी मालिका थांबता थांबत नसल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या समस्येवर एक बैठक घेण्यात आली.

परतवाड्यात बैठक गाजली : गतिरोधक, जयस्तंभ चौकातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवरपरतवाडा : शहरातील अपघाताची जीवघेणी मालिका थांबता थांबत नसल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या समस्येवर एक बैठक घेण्यात आली. शहरातील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण, अवैध वाहतूक जडवाहतुकीला प्रवेश बंद, जयस्तंभ हटविण्यासह, गतिरोधक व तैनात वाहतूक पोलीस कर्मचारी आपले ठिकाण सोडून दिवसभर वसुलीत मग्न राहात असल्याचा मुद्दा गाजला.बैठकीत अचलपुरचे उप-विभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकर, ठाणेदार किरण वानखडे, अचलपुरचे नरेंद्र ठाकरे, सरमसपुऱ्याचे ठाणेदार मुकेश गावंडे, परिवहन विभागाचे महल्लेंसह नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींमध्ये नगरसेवक बाळासाहेब वानखडे, रूपेश ढेपे, राजेंद्र लोटिया, सुरेश अटलानी, गजानन कोल्हे, प्रवीण तोंडगावकर, मनीष विधळे, नीलेश सातपुते, किशोर कासार, ओमप्रकाश दीक्षित, दिनेश ठाकरे, कौतीककर यांच्यासह मालवाहू ट्रॅव्हल्सचे मालक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.परतवाडा शहरात मागील पंधरा दिवसांत जयस्तंभ ते बसस्थानक या अमरावती महामार्गावर ट्रक अपघातात चार निष्पापांचे बळी गेले. यानंतर जनप्रक्षोभ उफाळला. मग कुठे पोलीस यंत्रणेला जाग आली. अलिकडे नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडी जाग आली आहे. अस्ताव्यस्त वाहतूक शहरातील सर्वसामान्यांच्या जिवावर बेतत असताना उपरोक्त तिन्ही विभागांचा समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शनिवारी वाहतूक समस्येवर नागरिकांची मते विचारण्या इतपत नामुष्की ओढविल्याचे विदारक चित्र आहे. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी पार पाडली असती तर अपघातात झालेली प्राणहानी टाळता आली असती, असे मत अनेकांनी बैठकीत व्यक्त केले. जयस्तंभ, गतिरोधक, अवैध वाहतूकवाढती लोकसंख्या व मध्यप्रदेशच्या आंतरराज्यीय सिमारेषांसह पाच तालुक्यांच्या सिमारेषांवर असलेल्या परतवाडा शहरात जडवाहतूक वाढली आहे. ४० पेक्षा अधिक खेड्यातून येथे अवैध प्रवासी वाहतूक चालते. नागरिकांचे लोंढे परतवाडा शहरात दिवसभर कामानिमित्त येत असतात. शहरातील प्रमुख मार्गांवर गतिरोधक नाही. जयस्तंभचे स्थानांतरण आणि चौपदीकरण झाल्यानंतर सुध्दास गतिरोधक दिलेला नाही. त्यामुले अवैध वाहतूक करणारी वाहने शहरातून भरधाव धावत असतात. पार्किंग झोन, बायपास अन् ओव्हरलोडपरतवाडा शहरात ठिकठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची परवानगी नगरपालिकेने दिली. मात्र, तेथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी करावी लागतात. मुख्य रस्त्यांवर वाहने उभी ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जड वाहतुकीसाठी रिंग रोडचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तावित आहे. हे कार्य वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. आरटीओ विभागाकडून ‘ओव्हर लोड’ ट्रक कसे सोडले जातात, हा मुद्दा देखील बैठकीत गाजला.