शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

वाहतूक पोलीस वसुलीत मग्न!

By admin | Updated: April 25, 2016 00:03 IST

शहरातील अपघाताची जीवघेणी मालिका थांबता थांबत नसल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या समस्येवर एक बैठक घेण्यात आली.

परतवाड्यात बैठक गाजली : गतिरोधक, जयस्तंभ चौकातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवरपरतवाडा : शहरातील अपघाताची जीवघेणी मालिका थांबता थांबत नसल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या समस्येवर एक बैठक घेण्यात आली. शहरातील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण, अवैध वाहतूक जडवाहतुकीला प्रवेश बंद, जयस्तंभ हटविण्यासह, गतिरोधक व तैनात वाहतूक पोलीस कर्मचारी आपले ठिकाण सोडून दिवसभर वसुलीत मग्न राहात असल्याचा मुद्दा गाजला.बैठकीत अचलपुरचे उप-विभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकर, ठाणेदार किरण वानखडे, अचलपुरचे नरेंद्र ठाकरे, सरमसपुऱ्याचे ठाणेदार मुकेश गावंडे, परिवहन विभागाचे महल्लेंसह नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींमध्ये नगरसेवक बाळासाहेब वानखडे, रूपेश ढेपे, राजेंद्र लोटिया, सुरेश अटलानी, गजानन कोल्हे, प्रवीण तोंडगावकर, मनीष विधळे, नीलेश सातपुते, किशोर कासार, ओमप्रकाश दीक्षित, दिनेश ठाकरे, कौतीककर यांच्यासह मालवाहू ट्रॅव्हल्सचे मालक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.परतवाडा शहरात मागील पंधरा दिवसांत जयस्तंभ ते बसस्थानक या अमरावती महामार्गावर ट्रक अपघातात चार निष्पापांचे बळी गेले. यानंतर जनप्रक्षोभ उफाळला. मग कुठे पोलीस यंत्रणेला जाग आली. अलिकडे नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडी जाग आली आहे. अस्ताव्यस्त वाहतूक शहरातील सर्वसामान्यांच्या जिवावर बेतत असताना उपरोक्त तिन्ही विभागांचा समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शनिवारी वाहतूक समस्येवर नागरिकांची मते विचारण्या इतपत नामुष्की ओढविल्याचे विदारक चित्र आहे. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी पार पाडली असती तर अपघातात झालेली प्राणहानी टाळता आली असती, असे मत अनेकांनी बैठकीत व्यक्त केले. जयस्तंभ, गतिरोधक, अवैध वाहतूकवाढती लोकसंख्या व मध्यप्रदेशच्या आंतरराज्यीय सिमारेषांसह पाच तालुक्यांच्या सिमारेषांवर असलेल्या परतवाडा शहरात जडवाहतूक वाढली आहे. ४० पेक्षा अधिक खेड्यातून येथे अवैध प्रवासी वाहतूक चालते. नागरिकांचे लोंढे परतवाडा शहरात दिवसभर कामानिमित्त येत असतात. शहरातील प्रमुख मार्गांवर गतिरोधक नाही. जयस्तंभचे स्थानांतरण आणि चौपदीकरण झाल्यानंतर सुध्दास गतिरोधक दिलेला नाही. त्यामुले अवैध वाहतूक करणारी वाहने शहरातून भरधाव धावत असतात. पार्किंग झोन, बायपास अन् ओव्हरलोडपरतवाडा शहरात ठिकठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची परवानगी नगरपालिकेने दिली. मात्र, तेथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी करावी लागतात. मुख्य रस्त्यांवर वाहने उभी ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जड वाहतुकीसाठी रिंग रोडचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तावित आहे. हे कार्य वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. आरटीओ विभागाकडून ‘ओव्हर लोड’ ट्रक कसे सोडले जातात, हा मुद्दा देखील बैठकीत गाजला.