शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

लक्ष्मीपूजनातील 'लक्ष्मी' महागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 18:13 IST

दिवाळीकरिता लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचे साहित्य म्हणजे 'केरसुणी'. ही लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदा केरसुणीच्या किमती वाढल्याने लक्ष्मीपूजनातील लक्ष्मी महागली अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहे.

अमरावती : दिवाळी आता आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे. शहरातील दुकाने फुलली आहेत. रेडिमेड कापडासह फराळाच्या साहित्याला लोकांची मागणी वाढली आहे.

कोरोनाचे सावट कायम असताना नवरात्रोत्सव सामान्यांसाठी नवउत्साह घेऊन आला, तोच उत्साह दिवाळीमध्ये कायम असणार आहे. वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वस्तूंचे भाव वाढल्याची प्रतिक्रिया सामान्य वर्गातून मिळत आहे. खासकरून महिला वर्गाला लागणाऱ्या पूजासाहित्यांचे भावसुध्दा वाढल्याची प्रतिक्रिया महिला वर्गातून होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या साहित्यांचे स्टॉल बाजारात सजले आहेत. दिवाळीकरिता लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचे साहित्य म्हणजे 'केरसुणी'. ही लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची मानली जाते. दिवाळी खरेदीची सुरुवात करताना सर्वात आधी खरेदीचा मान या केरसुणीला मिळतो, तशी प्रथा आहे.

मात्र, यंदा केरसुणीच्या किमती वाढल्याने लक्ष्मीपूजनातील लक्ष्मी महागली अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहे. केरसुणी बनविणारे कारागीर हे बहुधा छत्तीसगढ येथील असतात. यावर्षी सततच्या पावसामुळे केरसुणी बनविण्याकरिता लागणारे झाडांचे पत्तेही उशिरा प्राप्त झाले. त्या कारणाने केरसुणी या कमी प्रमाणात बनविण्यात आल्या. त्या कारणाने बाहेरील शहरातून केरसुणी या शहरात आल्या. साहजिकच येण्यासाठी लागणाऱ्या वाहतूक खर्चामुळे केरसुणीचे भाव वाढले. अमरावती शहरात इंदौर येथून केरसुणी विकण्यास येतात. बाजारात केरसुणीच्या किमती या ७० रुपये जोडी ते १०० रुपये जोडी विकल्या जात आहेत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

अमरावती शहरात केरसुणी बनविणारे कारागीर हे दिवाळीपूर्व दाखल होतात. ते आपल्या कुटुंबासह छत्री तलाव परिसरातील भागात राहतात व तेथील जंगलातूनच ते लागणारे साहित्य गोळा करतात. यावेळी मात्र कारागीर हे कमी असल्याने केरसुणी कमी प्रमाणात बनविण्यात आल्या. त्या कारणाने बाजारभाव वाढले, असे कारागीर म्हणाले.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Shoppingखरेदी