शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

आष्टगावच्या विद्युत कार्यालयात तोडफोड

By admin | Updated: October 14, 2015 00:30 IST

पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी १२ आॅक्टोबर रोजी आष्टगाव येथील विद्युत कंपनीच्या उपकेंद्रावर धाव घेऊन कार्यालयाची तोडफोड केली.

नागरिकांचा संताप : ९ जणांना अटक, ७५ हजारांचे नुकसानमोर्शी : पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी १२ आॅक्टोबर रोजी आष्टगाव येथील विद्युत कंपनीच्या उपकेंद्रावर धाव घेऊन कार्यालयाची तोडफोड केली. यामुळे ७५ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये दीपक खोडस्कर, गजानन दहेकर, वैभव खोडस्कर, स्वप्निल टाकळे, शरद, शैलेश झाडे, उत्कर्ष धोटे, देवेंद्र भुयार, सारंग खोडस्कर यांचा समावेश आहे. तर निस्वादे आणि १५ अन्य आरोपींचा शोध मोर्शी पोलीस घेत आहेत.आॅक्टोबर महिन्यात तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ओलिताचा वापर करतात. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी दूपारी ११.३० च्या सुमारास अंबाडा येथील शेतकरी मोठ्या संख्येत गोळा होऊन त्यांनी आष्टगाव येथील राज्य वीज कंपनीच्या उपकेंद्रावर धाव घेतली. त्यावेळी प्रभारी कनिष्ठ अभियंता सुशील तायडे कार्यालयात होते. जोपर्यंत कार्यकारी अभियंता चौधरी येत नाही, तोपर्यंत आपण येथून हटणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली. कनिष्ठ अभियंता सुशील तायडे यांनी कार्यकारी अभियंता चौधरी, प्रभारी सहायक अभियंता बारई, कनिष्ठ अभियंता जैस्वाल आदींना घटनेची माहिती दिली. दरम्यान, कार्यकारी अभियंता चौधरी आणि इतर अधिकारी आष्टगाव येथे पोहोचले. त्यांनी तणावाची स्थिती नियंत्रणात आणली. (तालुका प्रतिनिधी)