शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वन विभागातील ‘टॉप अप’ मॉडेल अडचणीत; प्रधान सचिवांविरुद्ध असंतोष?

By गणेश वासनिक | Updated: December 24, 2023 18:19 IST

वनबल प्रमुखांनी शासनाकडे समितीचा अहवाल केला सादर, ‘टॉप टू बॉटम’ वनकर्मचाऱ्यांमध्ये अभिसरण योजनेला विरोध

अमरावती : वने आणि वन्यजीव संरक्षणाच्या कामात मग्रारोहयो-अभिसरण योजना आणण्याचा घाट रचला असताना या योजनेस प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे नेमण्यात आलेल्या समितीने ‘टॉप अप’ मॉडेलमध्ये प्रचंड त्रुटी काढल्या असून समितीचा अहवाल राज्याचे वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता शासन कोणता निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वन्यजीव संरक्षण संवर्धनाच्या कामामध्ये मग्रारोहयो योजना अशी सरमिसळ करून अभिसरण (टॉप अप) प्रकारची नवीन योजना वन विभागाच्या प्रधान सचिवांनी वन विभागात तात्काळ राबविण्याचे निर्देश दिले होते. वास्तविकत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत लक्षात न घेता सरसकट टॉप अप राबविण्यावर जोर दिल्यानंतर या योजनेला ‘टॉप टू बॉटम’ विरोध झाला. 

वन विभागातील कनिष्ठ- वरिष्ठ वनाधिकारी आमने-सामने आल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टॉप अप’ मॉडेलचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांच्या अध्यक्षतेत १२ सदस्यांची एक समिती नियुक्त केली होती. या समितीने आठवड्याभरात अभ्यास करून अहवाल वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्यामार्फत शासनास सादर केला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती