शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अमरावतीत स्वच्छतागृहांचे आॅडिट, बांधकाम रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 22:14 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बांधली जाणारी सार्वजनिक, सामुदायिक व वैयक्तिक शौचालये सरकारच्या रडारवर आली आहेत.

अमरावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बांधली जाणारी सार्वजनिक, सामुदायिक व वैयक्तिक शौचालये सरकारच्या रडारवर आली आहेत. या शौचालयांच्या कामात पारदर्शकता राखण्यासाठी आणखी कडक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचे ‘थर्ड पार्टी आॅडिट’ करण्याचे संकेत नगरविकास विभागाने दिले असून या शौचालयांचे बांधकाम करताना प्री-फॅब्रिकेटेड साहित्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

शहरात पाचपेक्षा अधिक सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करायचे असेल, तर त्यासाठी आधी जिल्हाधिका-यांची मान्यता घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकांना दिले आहेत. २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत राज्यातील शहरांना हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले होते. त्यादृष्टीने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये वैयक्तिक, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये उभारण्यात आलीत. मात्र २ आॅक्टोबरपर्यंत शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शौचालयांची उभारणी करणे बंधनकारक असल्याने त्यात दर्जा राखला गेला नसल्याचे निरीक्षण नगरविकासने नोंदविले. या शौचालयांचे बांधकाम लवकर पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक ठरविण्यात आले होते. त्यामुळे नागरी स्थानिक संस्थांमध्ये शौचालयांची कामे वेगात सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवरही शौचालये उत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

शौचालयाचे बांधकाम करताना या कामात प्री-फॅब्रिकेटेड साहित्याचा वापर करू नये, सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी प्री-कास्ट साहित्याचा वापर करू नये, वैयक्तिक शौचालयाच्या साहित्याचा दर्जा तपासून घेण्याच्या सूचना आहेत. शौचालयाच्या बांधकामात विटा, सिमेंट, बांबू या साहित्याचा वापर करून बांधकाम दर्जेदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान अमरावती महापालिकेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आतापर्यंत १३ हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.

जिल्हाधिका-यांची मंजुरी अनिवार्यशहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शहराच्या हद्दीत सार्वजनिक शौचालये बांधली जात आहेत. या शौचालयांची संख्या पाचपेक्षा अधिक झाल्यास त्यासाठी जिल्हाधिका-यांनी मान्यता घेणे बंधनकारक केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शौचालये बांधण्याची गरजही जिल्हाधिका-यांना सादर करावी लागणार आहे. जिल्हाधिका-यांच्या मान्यतेनंतरच पुढील कारवाई करता येणार असल्याने शौचालयांच्या वाढत्या बांधकामावर व दर्जावर नियंत्रण येणार आहे. शौचालयांच्या बांधकामात दर्जा राखण्याबाबत नगरविकास विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. यात कसूर करणा-याविरूद्ध शिस्तभंगही प्रस्तावित आहे. त्या पार्श्वभूमिवर महापालिका क्षेत्रात शौचालयांचे बांधकाम करण्यात येत आहे. - सोमनाथ शेटे,  नोडल अधिकारी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान