शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आज लक्ष्मी, कुबेर अन् नव्या केरसुणीची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:18 IST

भगवान श्रीराम लंकाविजय मिळवून अयोध्येला परत येत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्वलित केलेले लाखो दिवे.....

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : भगवान श्रीराम लंकाविजय मिळवून अयोध्येला परत येत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्वलित केलेले लाखो दिवे अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाला लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे़बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता़ त्या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामनरूप धारण करून बळीराजाला तीन पाय टाकण्याएवढ्या भूमीचे दान मागितले़ विष्णूने तीन पायांनी त्रैलोक्य घेतले़ प्रसन्न झालेल्या विष्णूने बळीराजाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी केली जाईल, असा वर दिला.लक्ष्मी अश्विन अमावस्येच्या रात्री सर्वच घरी संचार करून आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान या दिवशी शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा, व रसिकता आढळते, तिथे ती स्थानापन्न होते. याशिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, सयंमी व क्षमाशील पुरुष आणि गुणवत्ता व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी लक्ष्मी वास करते. त्यामुळे घर लख्ख करणारी नवीन केरसुणी घराबाहेर उजव्या बाजूस कुकंवाने स्वास्तिक काढून त्यावर दांडा वर करून ठेवण्यात येतो़ लक्ष्मीपूजनाच्या अगोदर तिने झाडत आणतात जुनी केरसुणी उंबरठ्यावर आडवी ठेवून तिचा एक फड तोडून बाहेर फेकला जातो. अशी अलक्ष्मी नि:सारण विधी घराघरांत दिवाळीनिमित्त करण्यात येतो. ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे....म्हणून साजरी करतात दिवाळीदिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता़ यामुळे आनंदित झालेल्या गोकुळवासीयांनी दुसºया दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता़ इ़स़ २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती, तर जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता़ महावीर सवंत त्याच्या दुसºया दिवशी सुरू होते़ त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात़ प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे़