शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तिवसा, मोर्शीत गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, २१८ बाधित गावांतील २६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावरील पीक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. धारणी तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने शून्य पावसाची नोंद केली असली तरी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात गुरुवारी पहाटे ८ पर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देसर्वदूर वादळी पाऊस : वरुडमध्येही दाणादाण, पिकांचे अतोनात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये गुरुवारी पहाटे अवकाळी पावसादरम्यान गारपीटही झाली. सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळल्याने खरीप-रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, २१८ बाधित गावांतील २६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावरील पीक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. धारणी तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने शून्य पावसाची नोंद केली असली तरी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात गुरुवारी पहाटे ८ पर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांपासून अख्खा जिल्हा थंडीने गारठला असताना बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस बरसला. यात संत्रा, केळी, कपाशी, तूर या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.मोर्शी : तालुक्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २३.८ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यातील दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, पाळा, मायवाडी, सालबर्डी शिवारात पावसासह पाच मिनिटांपर्यंत गारपीट झाली. या परिसरात बोराच्या आकारासारखी गार कोसळल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शिवारातील आंबिया व मृग बहराची संत्री, तूर, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.वरूड तालुक्यात गारपीटअमरावती : वरूड तालुक्यातील आमनेर, एकदरा, वाठोडा, घोराड, देवूतवाडा, गणेशपूर, सावंगी, लिंगा, एकलविहीर, पुसला, शेंदूरजनाघाट, सातनूर, रवाळा, तिवसाघाट, टेंभूरखेडा, जरूड, राजूराबाजार, वाडेगाव, गाडेगांव, वघाळ, पवनी, हातुर्णा, लोणी, सावंगा, करजगांव, बेनोडा, बारगाव, जामगाव, गोरेगाव, बहादा या ठिकाणी पाऊस झाला.अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, अचलपूर, चिखलदरा, धारणी व चांदूर बाजार या ठिकाणी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अर्धा तास पाऊस झाला. या अवकाळी पावसाने संत्रा, केळी, तूर, कपाशीचे सर्वाधिक नुकसान केले.माझ्या दोन एकर केळीला गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे केळी पूर्णपणे फाटून गेली. तूर, कपाशीलासुद्धा तडाखा बसला आहे. आता मला नुकसान भरपाई देण्यात यावी.- दीपक सावरकर, शेतकरी, शेंदूरजना बाजारपहाटे पडलेल्या गारांचा खच दुपारीदेखील कायम होता. या गारपिटीने कपाशी व तूर पिकाला फटका बसला. आधी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात सोयाबीन भिजले. आता पुन्हा रबी हंगामात अवकाळी पावसाने नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- सागर बोडखे, सरपंच, शेंदूरजना बाजार

२१८ गावे बाधित, २६ हजार हेक्टरमध्ये नुकसानगुरुवारी पहाटे झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे चार तालुक्यांतील २१८ गावांमध्ये २६,३२४ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यात ५९ गावांतील ४५१३ हेक्टरवरील संत्रा, वरुड तालुक्यात १४० गावांमधील १०,४५९ हेक्टरवरील संत्रा, तिवसा तालुक्यात १७ गावांंमध्ये ३,३२० हेक्टरवरील संत्रा, गहू, तूर, हरभरा व कांदा तसेच चांदूरबाजार तालुक्यात दोन गावांमधील ४६५ हेक्टरवरील तूर व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तिवसा तालुक्याला गारपिटीचा जबर तडाखातिवसा : तालुक्यात गुरुवारी पहाटे ४ वाजता विजांच्या कडकडाटात मुसळधार अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. आकाशातून कोसळलेल्या गारी दुपारी १२ वाजेपर्यंत विरल्या नव्हत्या. एवढे सर्द वातावरण तालुक्यात यादरम्यान तयार झाले. या वातावरणाचा खरिपातील तूर, कपाशी, केळी तसेच रबीतील गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्यता वर्तविली होती. दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरूच होता. त्यात गुरुवारी पहाटे ४ वाजता तालुक्यातील शेंदूरजना बाजारसह निंबोरा देलवाडी, भांबोरा, पालवाडी, वरखेड, धामंत्री, मोझरी, शिरजगाव मोझरी गावांना व शिवाराला गारपिटीचा तडाखा बसला.

टॅग्स :Rainपाऊस