शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तिवसा 71, भातकुलीत 82 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने  मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. तिवसा येथे निवडणूक अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार वैभ फरतारे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे हे निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत विविध पक्ष, अपक्षासह १२२ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. त्यांच्या भाग्याचा फैसला १९ जानेवारी २०२२ रोजी मतमोजणीअंती होणार आहे. तिवस्यात  ७०.७० टक्के, तर भातकुली नगरपंचायतीत ८१.६१ टक्के मतदान झाले.नगरपंचायत निवडणूक अतिशय कडाक्याच्या थंडीत झाली. पहाटे १० वाजतापर्यंत भातकुली, तिवसा येथील मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. मात्र, दुपारी १२ वाजतानंतर केंद्रावर गर्दी वाढली. भातकुली नगरपंचायत निवडणुकीसाठी सायंकाळी ५ पर्यंत ८१.६१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने  मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. तिवसा येथे निवडणूक अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार वैभ फरतारे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे हे निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. 

भातकुलीत ६० उमेदवार - भातकुली नगरपंचायतीच्या निवडणुकीत २७५२ पुरुष, तर २,४९२ महिला असे एकूण ५,२४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८१.६१ आहे. १६ प्रभागातील एकूण ६० उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या सहा शाळांमध्ये १६ मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज होती.तिवस्यात ६२ उमेदवार- रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. भातकुली येथील जिल्हा परिषदेच्या विविध माध्यमांच्या चार शाळा, छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय व जडावबाई राठी विद्यालय येथे एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत झाले. १६ प्रभागातील २७५२ पुरुष व २४९२ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८१.६१ आहे. भातुकली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारीला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.

पालकमंत्री, आमदार, नेत्यांची परीक्षातिवसा येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर, तर भातकुलीत आमदार रवि राणा यांच्यासाठी नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. गत आठ दिवसांपासून आमदार प्रवीण पोटे, शिवसेनेचे राजेश वानखडे, भाजप  जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, बाजार समितीचे उपाध्यक्ष नाना नागमोते यांनीदेखील उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आहे. आता १९ जानेवारी रोजी निकालानंतरच कोण बाजी मारणार, हे निश्चित होणार आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक