शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

१,२६८ कोटींचे कर्ज थकीत

By admin | Updated: April 9, 2017 00:02 IST

सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कर्जमाफी केव्हा ? : दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा अमरावती : सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी विरोधी पक्षांनी रान उठविले. सातबारा कोरा होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यात ३१ मार्चअखेर दोन लाख तीन हजार शेतकऱ्यांकडे १२६७ कोटी रूपयांचे पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी कर्ज उपलब्ध होण्यास शेतकऱ्यांना अडसर निर्माण होणार आहे. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफीनंतर राज्यातदेखील याच निर्णयाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. मागील तीन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले व नव्याने कर्ज देण्यात आले.मागील खरीप हंगामात सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन झाले. मात्र हमीपेक्षा कित्येक पट कमी अशा दोन हजार रूपये क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. रबीमध्ये तुरीचीदेखील हीच अवस्था आहे. उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. अधिक झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाला धारेवर धरले आहे. सभागृहात व सभागृहाबाहेर तसेच गावागावांत आता कर्जमुक्तीसाठी संघर्ष इरेला पेटला असल्याने शेतकऱ्यांनीदेखील कर्ज माफ होईल, या आशेने कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे. कर्जमाफी न झाल्यास किंवा यावर शासनाने तोडगा न काढल्यास येत्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी उत्पन्न होणार आहे. (प्रतिनिधी)रबीत कर्जवाटपच नाहीरबी हंगामासाठी जिल्ह्यास ३८६ कोटी २२ लाख रूपयांचे लक्ष्यांक आहे. यामध्ये शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेस १२५ कोटी ४२ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटपाचा टक्का निरंक आहे. तसेच ग्रामीण बँकांना २ कोटी १६ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटप शून्य टक्के आहे. केवळ राष्ट्रीयीकृत बँकांनी २६० कोटींचे कर्जवाटप केले आहे. शेतकऱ्यांकडे १२६८ कोटींचे पीक कर्ज थकीत आहे. शासनाला यापूर्वीच अहवाल सादर केला आहे. थकीत कर्जामुळे नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. याविषयी शासनाला मार्गदर्शन मागितले आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक