शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

१,२६८ कोटींचे कर्ज थकीत

By admin | Updated: April 9, 2017 00:02 IST

सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कर्जमाफी केव्हा ? : दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा अमरावती : सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी विरोधी पक्षांनी रान उठविले. सातबारा कोरा होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यात ३१ मार्चअखेर दोन लाख तीन हजार शेतकऱ्यांकडे १२६७ कोटी रूपयांचे पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी कर्ज उपलब्ध होण्यास शेतकऱ्यांना अडसर निर्माण होणार आहे. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफीनंतर राज्यातदेखील याच निर्णयाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. मागील तीन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले व नव्याने कर्ज देण्यात आले.मागील खरीप हंगामात सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन झाले. मात्र हमीपेक्षा कित्येक पट कमी अशा दोन हजार रूपये क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. रबीमध्ये तुरीचीदेखील हीच अवस्था आहे. उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. अधिक झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाला धारेवर धरले आहे. सभागृहात व सभागृहाबाहेर तसेच गावागावांत आता कर्जमुक्तीसाठी संघर्ष इरेला पेटला असल्याने शेतकऱ्यांनीदेखील कर्ज माफ होईल, या आशेने कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे. कर्जमाफी न झाल्यास किंवा यावर शासनाने तोडगा न काढल्यास येत्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी उत्पन्न होणार आहे. (प्रतिनिधी)रबीत कर्जवाटपच नाहीरबी हंगामासाठी जिल्ह्यास ३८६ कोटी २२ लाख रूपयांचे लक्ष्यांक आहे. यामध्ये शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेस १२५ कोटी ४२ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटपाचा टक्का निरंक आहे. तसेच ग्रामीण बँकांना २ कोटी १६ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटप शून्य टक्के आहे. केवळ राष्ट्रीयीकृत बँकांनी २६० कोटींचे कर्जवाटप केले आहे. शेतकऱ्यांकडे १२६८ कोटींचे पीक कर्ज थकीत आहे. शासनाला यापूर्वीच अहवाल सादर केला आहे. थकीत कर्जामुळे नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. याविषयी शासनाला मार्गदर्शन मागितले आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक