शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

१,२६८ कोटींचे कर्ज थकीत

By admin | Updated: April 9, 2017 00:02 IST

सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कर्जमाफी केव्हा ? : दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा अमरावती : सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी विरोधी पक्षांनी रान उठविले. सातबारा कोरा होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यात ३१ मार्चअखेर दोन लाख तीन हजार शेतकऱ्यांकडे १२६७ कोटी रूपयांचे पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी कर्ज उपलब्ध होण्यास शेतकऱ्यांना अडसर निर्माण होणार आहे. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफीनंतर राज्यातदेखील याच निर्णयाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. मागील तीन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले व नव्याने कर्ज देण्यात आले.मागील खरीप हंगामात सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन झाले. मात्र हमीपेक्षा कित्येक पट कमी अशा दोन हजार रूपये क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. रबीमध्ये तुरीचीदेखील हीच अवस्था आहे. उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. अधिक झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाला धारेवर धरले आहे. सभागृहात व सभागृहाबाहेर तसेच गावागावांत आता कर्जमुक्तीसाठी संघर्ष इरेला पेटला असल्याने शेतकऱ्यांनीदेखील कर्ज माफ होईल, या आशेने कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे. कर्जमाफी न झाल्यास किंवा यावर शासनाने तोडगा न काढल्यास येत्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी उत्पन्न होणार आहे. (प्रतिनिधी)रबीत कर्जवाटपच नाहीरबी हंगामासाठी जिल्ह्यास ३८६ कोटी २२ लाख रूपयांचे लक्ष्यांक आहे. यामध्ये शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेस १२५ कोटी ४२ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटपाचा टक्का निरंक आहे. तसेच ग्रामीण बँकांना २ कोटी १६ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटप शून्य टक्के आहे. केवळ राष्ट्रीयीकृत बँकांनी २६० कोटींचे कर्जवाटप केले आहे. शेतकऱ्यांकडे १२६८ कोटींचे पीक कर्ज थकीत आहे. शासनाला यापूर्वीच अहवाल सादर केला आहे. थकीत कर्जामुळे नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. याविषयी शासनाला मार्गदर्शन मागितले आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक