शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

विदर्भातील वाघांचे सह्याद्रीत होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 17:09 IST

आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडे प्रस्तावताडोबा येथील आठ वाघ पाठविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानव- वन्यजीव संघर्षाची पार्श्वभूमी बघता विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. त्यानुसार राज्याच्या वनविभागाने प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांच्याशी वनविभागाने चर्चा केली.विदर्भात वाघांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त वाघ असल्याने त्यांना संचारासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी उडत आहे. विदर्भातील वाघ हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील असून, त्यांना दऱ्या, डोंगराची सवय नाही. त्यातुलनेत सह्याद्री अभयारण्य हे थंड प्रदेशातील आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर असा मोठा भाग मुंबई पश्चिम वन्यजीव विभागाशी जोडण्यात आला आहे. भौगलिकदृष्ट्या दऱ्या, खोऱ्यांनी वेढलेला असून, हल्ली सह्याद्रीत पाच ते आठ वाघ असल्याची नोंद आहे. १५०० चौरस किमीचा हा प्रदेश निसर्गरम्य वातावरणाने नटलेल्या आहे. आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही. सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्या भागातील गावांच्या ग्रामपंचायतींची ना-हरकत घ्यावी लागणार आहे. प्रक्रिया फार किचकट असल्याने सहजतेने वाघांचे स्थलांतर करणे सोपे नाही, अशी वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.तीन ते पाच वर्षाचे वाघ स्थलांतरणाची प्रक्रियाविदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हल्ली क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना ३ ते ५ वयोगटातील वाघांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.वनसचिव मुख्यमंत्र्यांना देणार प्रस्तावविदर्भातील वाघांचे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव वनसचिव हे राज्य वन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यापश्चात व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येईल. सर्वोच्च न्यायालयालासुद्धा वाघांच्या स्थलांतरणाची माहिती द्यावी लागणार आहे.

वनमंत्र्यांशी वाघांच्या स्थलांतरणाबाबत चर्चा झालेली आहे. राज्य वन मंडळात याविषयी लवकरच मंथन होणार आहे. वाघांच्या स्थलांतरणासाठी अन्य पर्यायदेखील आहेत.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव