शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघांचे सह्याद्रीत होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 17:09 IST

आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडे प्रस्तावताडोबा येथील आठ वाघ पाठविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानव- वन्यजीव संघर्षाची पार्श्वभूमी बघता विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. त्यानुसार राज्याच्या वनविभागाने प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांच्याशी वनविभागाने चर्चा केली.विदर्भात वाघांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त वाघ असल्याने त्यांना संचारासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी उडत आहे. विदर्भातील वाघ हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील असून, त्यांना दऱ्या, डोंगराची सवय नाही. त्यातुलनेत सह्याद्री अभयारण्य हे थंड प्रदेशातील आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर असा मोठा भाग मुंबई पश्चिम वन्यजीव विभागाशी जोडण्यात आला आहे. भौगलिकदृष्ट्या दऱ्या, खोऱ्यांनी वेढलेला असून, हल्ली सह्याद्रीत पाच ते आठ वाघ असल्याची नोंद आहे. १५०० चौरस किमीचा हा प्रदेश निसर्गरम्य वातावरणाने नटलेल्या आहे. आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही. सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्या भागातील गावांच्या ग्रामपंचायतींची ना-हरकत घ्यावी लागणार आहे. प्रक्रिया फार किचकट असल्याने सहजतेने वाघांचे स्थलांतर करणे सोपे नाही, अशी वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.तीन ते पाच वर्षाचे वाघ स्थलांतरणाची प्रक्रियाविदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हल्ली क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना ३ ते ५ वयोगटातील वाघांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.वनसचिव मुख्यमंत्र्यांना देणार प्रस्तावविदर्भातील वाघांचे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव वनसचिव हे राज्य वन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यापश्चात व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येईल. सर्वोच्च न्यायालयालासुद्धा वाघांच्या स्थलांतरणाची माहिती द्यावी लागणार आहे.

वनमंत्र्यांशी वाघांच्या स्थलांतरणाबाबत चर्चा झालेली आहे. राज्य वन मंडळात याविषयी लवकरच मंथन होणार आहे. वाघांच्या स्थलांतरणासाठी अन्य पर्यायदेखील आहेत.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव