शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

देशात वाघ वाढले; पण...; विदर्भातील वाघ कंबोडियात जाणार!

By गणेश वासनिक | Updated: April 16, 2023 16:28 IST

देशात १९७३ मध्ये ९ व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात मेळघाट व ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. 

अमरावती : व्याघ्र गणनेत देशभरात वाघांची संख्या ३१६७ झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंद संचारलेला आहे. यात व्याघ्र प्रकल्पांचा सिंहाचा वाटा असला तरी अपुरे पडणारे जंगल आणि वाघांची कॉरिडॉरमुळे घुसमट वाढली आहे.भारतातील व्याघ्र प्रकल्पांना मोठी ताकद देण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. देशात १९७३ मध्ये ९ व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात मेळघाट व ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. 

आजमितीस देशात ४२ च्यावर व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. देशातील जंगलामध्ये वाघांच्या संरक्षणात व्याघ्र प्रकल्पांचा मोठा वाटा मानला जातो. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण हे व्याघ्र प्रकल्पांवर मॉनिटरिंग करते. या प्राधिकरणाची दिल्ली येथे २००५ मध्ये स्थापना झाली असली तरी कमी कालावधीत या प्राधिकरणाने वाघांच्या संख्येत वाढ करण्याची किमया केली आहे. किंबहुना वाघ तस्करीच्या बेहलिया टोळीचा बीमोड झाल्याने पूर्व भारतात वाघांची संख्या अलीकडे वाढल्याचे वास्तव आहे.

वाघ कसे वाढले?जगात बेंगाल टायगर म्हणून भारतातील वाघांना अधिक महत्त्व आहे. जगभरातील १७ देशांमध्ये वाघांचे ५ ते १० टक्के अस्तित्व असून, जगभरातील वाघांच्या टक्केवारीचा विचार केल्यास एकट्या भारतात ७५ टक्के एवढी संख्या वाघांची आहे. देशात दर चार वर्षांनी ३०० ते ५०० वाघ वाढले. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यात १५० ते २५० वाघांची वाढ आहे.

वाघांचे मृत्यूही तेवढेचगत चार वर्षांत मध्य प्रदेश, महाराष्ट्रात किमान २०० वाघ विविध कारणांनी मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत वाघ मृत्युमुखी पडले आहेत. काही वाघ विजेचा धक्का लागून ठार झाले आहेत. त्यामुळे वाघांची संख्या पुन्हा कमी होणार नाही, याची काळजी घेणे काळाची गरज आहे.

कंबोडियात वाघ जाणारविदर्भात मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या २५५ च्यावर आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव असा संघर्ष गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाला आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील १० ते १२ वाघ हे कंबोडियात हलविले जाणार असून याबाबतचा करार भारत आणि कंबोडिया सरकारमध्ये झाल्याची माहिती आहे. मात्र, वाघ केव्हा पाठविणार, हे निश्चित झाले नाही. एकेकाळी कंबोडियात मोठ्या प्रमाणात वाघ होते. तथापि, शिकारींमुळे या ठिकाणी वाघ संपल्यागत आहे. भारतातून २५ पेक्षा जास्त वाघ कंबोडियात टप्प्याटप्प्याने जाणार असल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाघ अन्य ठिकाणी हलविण्याबाबतचा सर्व्हे झाला आहे. केंद्र सरकारच्या एनटीसीए याबाबतची कार्यवाही करणार आहे. मात्र वाघ नेमके कुठे पाठविणार यासंदर्भात तूर्तास निश्चित झाले नाही.- सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्यमंत्री

व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या आकडेवारीवर एक नजर...वर्षे                  संख्या- २००६           १४११- २०१०         १७०६- २०१४         २२२६- २०१८       २९६७- २०२२         ३१६७

टॅग्स :Tigerवाघ