शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

जंगलात वाघांची घुसमट; स्थलांतर वाढले

By admin | Updated: April 13, 2015 01:29 IST

पाच ते १० वर्षांपूर्वी वाघांचे स्थलांतर फारच कमी व्हायचे. मात्र, अलिकडे वन्यपशुंना जंगलात पुरेसे सुरक्षित वातावणर मिळत

गणेश वासनिक ल्ल अमरावतीपाच ते १० वर्षांपूर्वी वाघांचे स्थलांतर फारच कमी व्हायचे. मात्र, अलिकडे वन्यपशुंना जंगलात पुरेसे सुरक्षित वातावणर मिळत नाही. शिवाय अन्न-पाण्याचाही अभाव असतो. परिणामी भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ ते जंगलांच्या सीमा ओलांडून बाहेर पडू लागले आहेत. अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रात तब्बल ६० कि.मी.चा प्रवास करुन बोर, नागझिरा अभयारण्यातून आलेली वाघिणीही याच स्थलांतरण प्रक्रियेतून येथपर्यंत पोहोचली आहे. ही वाघिण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने वनविभागाला आश्चर्याचा धक्का बसला. वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. परंतु वन्यपशुंना पाणी, शिकार करण्याचे स्वातंत्र्य हिरावले.वनविभाग अनभिज्ञव्याघ्र प्रकल्पातून पाणी, शिकारीच्या शोधार्थ वाघ जंगलाबाहेर पडत असताना या प्रकारापासून वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. साधारणपणे तीन ते आठ वयोगटातील नर वाघ विविध कारणांनी २५ ते ३० कि.मी. च्या परिघात फिरतो. नर वाघाच्या तुलनेत वाघीण ही त्यापेक्षा कमी प्रवास करते. मात्र, पट्टेदार वाघिणीने तब्बल ६० कि.मी.चा धोकादायक प्रवास करुन स्थलांतर केल्याची बाब स्पष्ट झाली आहे.४० वर्षांनंतरही व्याघ्र प्रकल्पात पाणी, भक्ष्याची टंचाईवाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी देशभरात व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. येथे वाघांना मुक्त संचार, सुरक्षित जगता यावे, हा उद्देश होता. मात्र, ४० वर्षांनंतरही वन्यपशुंना पाणी, शिकारीच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरु होताच व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाणी टंचाई भासू लागली आहे. जंगलात हरणांची संख्या कमी झाल्याने भक्ष्य शोधण्यासाठी वाघाला जीवावर बेतणारी कसरत करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात भूकबळीने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती.वन अधिकाऱ्यांमध्ये ‘कम्युनिकेशन गॅप’राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी विदर्भात ताडोबा, पेंच, मेळघाट, नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प आहेत. यात ताडोबा, पेंचमध्ये सर्वाधिक वाघ आपल्या सीमेतून दुसऱ्या सीमेत गेल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, वाघ दुसऱ्या हद्दीत गेल्यानंतरही याबाबत माहिती देणे किंवा जाणून घेण्याची तसदी देखील वनअधिकाऱ्यांनी घेतली नाही. खरे तर बेपत्ता वाघांची शोधमोहीम राबवून इंत्यभूत माहिती जाणून घेणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु वनअधिकाऱ्यांमध्ये ‘कम्युनिकेशन गॅप’ असल्याने जंगलातून वाघांचे राजरोसपणे स्थलांतर होत आहे.वडाळी वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघीण आली आहे. ही वाघीण कोठून आली असावी याचा कसून शोध घेतला जात आहे. प्राप्त छायाचित्रानुसार ही वाघीण बोर, नागझिरा येथून आली असावी, असा अंदाज आहे. ती सुरक्षित राहावी यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.- नीनू सोमराजउपवनसंरक्षक, अमरावती.