शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

नरभक्षक वाघ बनबेहरा जंगलात; दहशत कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 18:38 IST

पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले.

- नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले. पुढची दिशा उत्तर की पश्चिम, यावरच आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वाघाची दहशत अद्यापही कायम आहे.बारा दिवस अमरावती जिल्हा दहशतीखाली ठेवणारा नरभक्षक वाघ पाच दिवसांपासून मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील आठनेर वनपरिक्षेत्रातील जंगलात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील वनाधिकारी त्याचे दररोजचे लोकेशन घेत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत परतवाडा, मोर्शी आणि वरूड परिक्षेत्रातील वन कर्मचारी सीमाभागावर लक्ष ठेवून होते. या चार दिवसांत त्याने कुठलीच शिकार केली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वाघोबाची पुढची शिकार काय, यावरच गस्तीवरील कर्मचाºयांमध्ये खल सुरू होता. त्याची पुढील वाटचाल उत्तर दिशेकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बहिरम की सातपुडा व्याघ्र प्रकल्प?चंद्रपूरपासून उत्तर दिशेचा प्रवास मध्य प्रदेशातही युवा नरभक्षी वाघाने कायम ठेवला आहे. पलासपानीतून पुढे बनबेहरा जंगलात जाताना त्याने उत्तर दिशेनेच पुढची वाटचाल केली. ही वाटचाल सुरूच राहिल्यास बैतूलच्या सातपुडा टायगर रिझर्वमध्ये तो स्थिरावू शकतो. बहिरम वाघाच्या सध्याच्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर पश्चिमेकडे आहे. तेव्हा  नरभक्षी  बहिरमच्या जंगलात येण्याची  शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवडाभर त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाघ ज्या दिशेने आला त्याच दिशेने परत जाण्याची  येत नसल्याचे काही  तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

अवनीप्रमाणे त्यालाही शूट करायवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात प्रचंड दहशत पसरून अनेकांचा जीव घेणाºया अवनी वाघिणीला शनिवारी गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर बारा दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालून दोन जणांचा जीव आणि पाळीव प्राण्यांची शिकार करणाºया युवा वाघाला केवळ बंदुकीतून बेशुद्धीचे इंजेक्शन देण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या. वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी त्याला अडकविण्यासाठी पिंजरा लावला. चतुर वाघाने मार्ग बदलू पुढचा पल्ला गाठला. वाघ पुन्हा परतल्यास त्याला हमला करण्यापूर्वी तत्काळ जेरबंद किंवा गोळ्या घालून ठार करण्याची ही मागणी आता अवनीला ठार केल्यानंतर होऊ लागली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ