शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नरभक्षक वाघ बनबेहरा जंगलात; दहशत कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 18:38 IST

पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले.

- नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले. पुढची दिशा उत्तर की पश्चिम, यावरच आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वाघाची दहशत अद्यापही कायम आहे.बारा दिवस अमरावती जिल्हा दहशतीखाली ठेवणारा नरभक्षक वाघ पाच दिवसांपासून मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील आठनेर वनपरिक्षेत्रातील जंगलात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील वनाधिकारी त्याचे दररोजचे लोकेशन घेत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत परतवाडा, मोर्शी आणि वरूड परिक्षेत्रातील वन कर्मचारी सीमाभागावर लक्ष ठेवून होते. या चार दिवसांत त्याने कुठलीच शिकार केली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वाघोबाची पुढची शिकार काय, यावरच गस्तीवरील कर्मचाºयांमध्ये खल सुरू होता. त्याची पुढील वाटचाल उत्तर दिशेकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बहिरम की सातपुडा व्याघ्र प्रकल्प?चंद्रपूरपासून उत्तर दिशेचा प्रवास मध्य प्रदेशातही युवा नरभक्षी वाघाने कायम ठेवला आहे. पलासपानीतून पुढे बनबेहरा जंगलात जाताना त्याने उत्तर दिशेनेच पुढची वाटचाल केली. ही वाटचाल सुरूच राहिल्यास बैतूलच्या सातपुडा टायगर रिझर्वमध्ये तो स्थिरावू शकतो. बहिरम वाघाच्या सध्याच्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर पश्चिमेकडे आहे. तेव्हा  नरभक्षी  बहिरमच्या जंगलात येण्याची  शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवडाभर त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाघ ज्या दिशेने आला त्याच दिशेने परत जाण्याची  येत नसल्याचे काही  तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

अवनीप्रमाणे त्यालाही शूट करायवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात प्रचंड दहशत पसरून अनेकांचा जीव घेणाºया अवनी वाघिणीला शनिवारी गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर बारा दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालून दोन जणांचा जीव आणि पाळीव प्राण्यांची शिकार करणाºया युवा वाघाला केवळ बंदुकीतून बेशुद्धीचे इंजेक्शन देण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या. वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी त्याला अडकविण्यासाठी पिंजरा लावला. चतुर वाघाने मार्ग बदलू पुढचा पल्ला गाठला. वाघ पुन्हा परतल्यास त्याला हमला करण्यापूर्वी तत्काळ जेरबंद किंवा गोळ्या घालून ठार करण्याची ही मागणी आता अवनीला ठार केल्यानंतर होऊ लागली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ