शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.

ठळक मुद्देमेळघाट : महावितरणचा कारभार, जारिदा उपकेंद्र वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : महावितरणच्या बेताल कारभाराचा फटका मेळघाटच्या अतिदुर्गम तीन गावांना बसला आहे. या गावांना विद्युत पुरवठा करणारी केबल वनविभागाच्या वृक्षतोड मोहिमेत तुटल्याने ही गावे तीन महिन्यांपासून अंधारात आहेत. दुसरीकडे तीन वर्षांपासून जारिदा उपकेंद्र अधिकाऱ्यांविना वाऱ्यावर आले आहे.तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.अचलपूर येथील कार्यकारी अभियंता या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चिखलदरा पंचायत समितीचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी तक्रारीत केला आहे. एकताई, सलिता, भांडूम या गावांमध्ये पूर्णत: अंधाराचे साम्राज्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हिंस्त्र वन्यप्राणी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून गावानजीक येतात. अंधारात ते दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने त्यांच्या भीतीखाली आदिवासी जगत आहेत.वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा योजना व पीठ गिरणीसुद्धा बंद पडल्या आहेत. याशिवाय वीजपुरवठा नसल्याने नागरिकांना इतरांशी संपर्क साधणेदेखील अवघड ठरले असल्याने समस्यांत भर पडली आहे. वनविभागामार्फत जंगलात वृक्षतोड करण्यात आली. त्यामध्ये सदर केबल तुटला. ती जोडणी करण्यासाठी संबंधित कंपनीला आवश्यक असलेले मटेरियल लॉकडाऊनमध्ये मिळाले नाही . लवकरच तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल.- व्ही .एम. बागडे,सहायक अभियंता (महावितरण), परतवाडा

टॅग्स :electricityवीज